एक्स्प्लोर

Prakash Ambedkar In Kolhapur : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध, विधानसभेला ओबीसीकडे मोर्चा वळवला; प्रकाश आंबडेकर काय काय म्हणाले?

संविधान बचाव हा अजेंडा आम्ही सुरुवातीला घेतला होता. मात्र, त्यानंतर तो इंडिया आघाडीने घेतला. त्यामुळे मुस्लिम मते इंडिया आघाडीकडे वळली आणि आमच्या मतांमध्ये घट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) बाबतीत टोलवाटोलवी सुरु आहे. मराठा आरक्षण बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मत स्पष्ट करावे तसेच भाजप आणि शिवसेनेने सुद्धा मत स्पष्ट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आज कोल्हापूरमध्ये (Prakash Ambedkar In Kolhapur) पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली. ओबीसींचे 100 आमदार निवडून आले पाहिजेत असे आमचे मत आहे. आमची राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले. संविधान बचाव हा अजेंडा आम्ही सुरुवातीला घेतला होता. मात्र, त्यानंतर तो इंडिया आघाडीने घेतला. त्यामुळे मुस्लिम मते इंडिया आघाडीकडे वळली आणि आमच्या मतांमध्ये घट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला

सगेसोयरेला आमचा विरोध 

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगेसोयरे आरक्षणाला आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने सगेसोयरेबाबत जे जजमेंट दिलं आहे त्यामध्ये सगेसोयरे आरक्षण नाकारलं असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण देखील टिकणार नाही, त्यामुळे योग्य सल्ला घेऊन हे केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावर बोलताना काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ मराठ्यांचा पक्ष राहिला आहे. मराठा आरक्षणावर भाजप आणि शिवसेना देखील भूमिका स्पष्ट करत नाही. भाजप झुंजी लावून कसे लढतात हे बघत बसला आहे, अशी टीका त्यांनी केली. 

आम्हाला दोन्हीकडून वाजवलं जाणार 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की मी ज्या समाजाचा आहे त्याची मत मला कशी मिळतील याचा प्रत्येक जण विचार करत आहे. शांतता राखावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यात्रा झाल्यानंतर विधानसभेचे बघू असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला दोन्हीकडून वाजवले जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे म्हणतात ते आमचे नाहीत आणि दुसरे म्हणतात हे आमचे नाहीत. त्यामुळे आम्हाला दोन्हीकडून बाजूला जाणार हे आम्हाला माहित आहे. मला भाजपची बी टीम सुद्धा म्हणतात पण मला कोणी हरवलं? अशी विचारणा त्यांनी केली. मला भाजपने हरवलं मग कसं म्हणता? असा प्रश्न त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report
Raj Thackeray : अखेरची निवडणूक, अस्तित्वाची लढाई? अन् सगळ्यांना मराठी माणूस आठवला.. Special  Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget