एक्स्प्लोर
Advertisement
राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा दिला.
राज्यातही सत्तेतील भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीपासून प्रत्येक निर्णयावर शिवसेनेनं उठवलेली झोड, मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या समृद्धी महामार्गसारख्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, मोदी चोर है च्या घोषणा, आदींमुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार शाबूत आहे, पण काही अडचण आलीच, तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यास तयार असल्याचं सूचित केलं होतं. तर त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या संजय राऊत यांनी अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात, असं म्हटलं होतं.
तिकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत तरी शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचं चित्र तरी दाखवतील. पण भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागले आहे. त्यामुळे बिहारमध्ये जी नवीन समीकरणं तयार होतील, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काही समीकरण होतील का, भाजप आणि सेनेचे संबंध अजून बिघडतील की पक्ष वाचवण्यासाठी युतीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील या चर्चेला विधान भवनात उधाण आलं आहे.
5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, तर राज्यात पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टनंतर राज्यात काही घडामोडी होतील का याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या
नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री
अदृश्य ‘हात’ दोन्ही बाजूकडे असतात : संजय राऊत
कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?
राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
नितीश कुमार यांचा राजीनामा, मोदींकडून अभिनंदन!
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement