एक्स्प्लोर

दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे राज्याच्या पैशांसाठी पाठपुरावा करा, केंद्रीय मंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नवाब मलिकांची टीका

राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा जास्त राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

मुंबई : महाराष्ट्रात 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा आहे. महाराष्ट्रातून नव्यानं केंद्रात मंत्री झालेले नेते महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नारायण राणे कोकण दौरा करणार आहेत. भारती पवार उत्तर महाराष्ट्रचा दौरा करणार आहेत तर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी असल्याची माहिती आहे. माझं या सर्वांना सांगणं आहे की, दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्याचे पैसे आहेत त्यासाठी पाठपुरावा करा. राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला आहे.
 
याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र माझं त्यांना हेच सांगणं आहे की, मागील काही वर्षाची जीएसटीची राज्याची रक्कम केंद्रात पडून आहे. जीएसटीचे पैसे राज्यात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावा. दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्याचे पैसे आहेत, त्यासाठी पाठपुरावा करा. राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा जास्त राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करावा. 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलून अदानींचे नाव देणे सर्वात मोठी चूक आहे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या नावाबाबत टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलून अदानी विमानतळ करणे योग्य नाही. ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. 

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी व शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली, परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावे. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. परंतु नाव बदलण्याचा व नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. 

एमपीएससी सदस्य निवडीबाबत बोलताना मलिक म्हणाले की, राज्य सरकार ने एमपीएससी सदस्य निवडण्यासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर 3 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवले आहेत. अजूनही निर्णय नाही. आम्हाला आशा आहे की लवकरच राज्यपाल निर्णय घेतील. आता हा विषय राज्यपालांकडे आहे. आशा आहे ते लवकर निर्णय घेतील. 31 जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नावे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करुन प्रस्ताव परत शासनाकडे पाठवतील व त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल. मात्र निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
Embed widget