एक्स्प्लोर

मोदींची अवस्था 'गजनी' तील आमीर खानसारखी : धनंजय मुंडे

जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत. या लाटेने राज्याचे किती वाटोळे झाले हे आपण अनुभवत आहोत, असेही मुंडे म्हणाले.

पालघर : पाच वर्षांत मोदींनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था आज गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगड येथील सभेत केली. जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत. या लाटेने राज्याचे किती वाटोळे झाले हे आपण अनुभवत आहोत, असेही मुंडे म्हणाले. विक्रमगड येथे निर्धार परिवर्तनाचा या सभेत ते बोलत होते. चार वर्षे झाली सत्तेत येवून परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र केला नाहीत. उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केले असा आरोप धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. चार वर्षात महाराष्ट्र लुटला आहात त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही असेही  मुंडे म्हणाले. आज 2014 च्या निवडणुकीतील मोदींनी केलेली भाषणे आणि आजची त्यांची भाषणे ऐकल्यानंतर गजनी सिनेमाची आठवण येते. नरेंद्र मोदींची अवस्था गजनी सारखी झाल्याची टीका मुंडे यांनी केली.  मुंडे पुढे म्हणाले की, जीवनावश्यक वस्तुंचे भाव एवढे वाढलेत. हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आमची ताई तर लहान मुलांची चिक्कीच खाऊन गेली अशी टीका त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली. राज्यातील आदिवासींना भाजप वनवासी समजतंय : छगन भुजबळ आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीका  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.  मुस्कटदाबी, दादागिरी सुरु आहे. कुणी काय खायचं आणि कसं लिहायचं हे यांनी ठरवायचं. त्यामुळे आता फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे, अशी भीती भुजबळ यांनी व्यक्त केली. आपल्या सोबत मन की बात आणि अदानी-अंबानी सोबत धन की बात असे बोलत नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला असा आरोपही भुजबळ यांनी केला. पोकळ वाशासारखी सरकारची अवस्था : अजित पवार घर आहे पोकळ वासा, वारा जाई फसफसा अशी अवस्था या सरकारची झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली. प्रधानमंत्री जनधन,सुकन्या, मुद्रा, आवास, फसलविमा, ग्रामसिंचन, सुरक्षा, उज्ज्वला, दीनदयाळ, अमृत आहार इतक्या योजना या सरकारने आणल्या परंतु याचा फायदा किती झाला, काय मिळालं जनतेला असा सवालही पवार यांनी जनतेला केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे परंतु केंद्राने एक रुपयाही राज्याला दिला नाही. याविषयी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी आले परंतु या पथकाने रात्रीची पाहणी केली अ‌शी रात्रीची पाहणी कुणी केली होती का असा सवाल पवार यांनी केला.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget