एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे बंद असलेले सोलापुरातील मोबाईल मार्केट सुरु, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

मोबाईलचा अतिवापर, तापमानमुळे मोबाईलमध्ये झालेल बिघाड, हेडफोन, चार्जर साऱख्या एक्सेसिरिज खरेदी या सर्वांमुळे सोलापुरातील प्रसिद्ध अशी मोबाईल गल्ली सध्या ग्राहकांनी गजबजली आहे. खराब मोबाईल दुरुस्त करणे किंवा नवीन मोबाईल, टॅब खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच वर्दळ सध्या या बाजारात दिसतेय.

सोलापूर : गेल्या 70 ते 75 दिवस बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत. सम-विषम किंवा एकदिवसाआड दुकाने सुरु करण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्यात. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मोबाईल मार्केटला काही प्रमाणात अच्छे दिन आले आहेत.

लॉकडाऊनमध्ये अनेक शाळांनी ऑनलाईन लर्निंगचे धडे देण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे कंपन्यामध्ये देखील वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी स्मार्टफोनचा वापर केला. मोबाईलचा अतिवापर, तापमानमुळे मोबाईलमध्ये झालेल बिघाड, हेडफोन, चार्जर साऱख्या एक्सेसिरिज खरेदी या सर्वांमुळे सोलापुरातील प्रसिद्ध अशी मोबाईल गल्ली सध्या ग्राहकांनी गजबजली आहे. खराब मोबाईल दुरुस्त करणे किंवा नवीन मोबाईल, टॅब खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच वर्दळ सध्या या बाजारात दिसतेय.

सोलापूर शहारात जवळपास 150 मोबाईल विक्रीची दुकानं आहेत. या रिटेल शॉप्समधून दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होत असते. लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनंतर सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मोबाईल रिटेलर असोशिएशनचे अध्यक्ष महेश चिंचोळी यांनी दिली. मात्र बऱ्याच ग्राहकांना स्टॉक कमी असल्याने घरी परतावे लागत असल्याचेही विक्रेते सांगत आहेत. लॉकडाऊनमुळे मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे मोबाईल उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात ग्राहकांची मोठी मागणी असताना देखील स्टॉक नसल्याने परिणाम झाल्याची माहिती मोबाईल विक्रेते संजय फाटे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. मात्र काही कंपनीनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. अद्यापही सोलापुरातील परिस्थिती पाहता व्यवहार पूर्णपणे सुरु होतील असे वाटत नाही. त्यामुळे अनेकजण मोबाईल विक्री सुरु होताच खरेदीसाठी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनमध्ये मोबाईल खराब झाल्यानंतर सर्व्हिस सेंटर बंद होते. त्यामुळे आता नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रिया मोबाईल खरेदी करण्यासाठी आलेल्या संभाजी शेळके यांनी दिली.

केंद्र सरकाने वाढवलेल्या जीएसटीमुळे मोबाईलच्या दरात देखील फरक पडला आहे. याआधी मोबाईलवर 12 टक्के जीएसटी होता, तो वाढवून 18 टक्के करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून मोबाईलच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद होते. त्यामुळे सरकारने करांच्या रकमेत कपात करावी अशी मागणी मोबाईल विक्रेते राज सलगर यांनी केली. दरम्यान मोबाईल गल्लीत वाढणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे मोबाईल गल्ली नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. परिसरात कोणतेही वाहन आणण्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आहे. मात्र लोकांनी बॅरिकेडिंग हटवून वाहनं बाजारात आणल्याने मोठी गर्दी होतेय. ही गर्दी हटवण्यासाठी मात्र पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget