एक्स्प्लोर

औरंगाबादच्या बैठकीत मराठा मोर्चासाठी राज्यव्यापी समिती स्थापन

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये काल मराठा क्रांती मोर्चा समिती स्थापन करण्यात आली. संपूर्ण राज्यातून समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातून 11 जणांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत चर्चेनंतर सर्वानुमते एक राज्यव्यापी समिती तयार करण्यात आली. आजवर मराठा मोर्चांना कोणतेही राजकीय नेतृत्व नव्हते किंवा कोणताही राजकीय चेहरा नव्हता. त्यामुळे आता ही समिती स्थापन झाल्यानं या समितीला आपल्या मागण्या सरकारसमोर मांडून सरकारशी चर्चा करता येणार आहे. मराठा क्रांती मोर्चा समितीतील सदस्य 1. न्या. पी. बी सावंत 2. न्या. बी. एन. देशमुख 3. न्या. म्हसे 4. सदानंद मोरे 5. प्रा. तांबे 6. जयसिंगराव पवार 7. वसंतराव मोरे 8. निर्मलकुमार देशमुख 9. राजेंद्र कोंढरे औरंगाबादमध्ये झालेल्या या बैठकीतून विविध मागण्यातून एक ठराव मांडण्यात आला. या ठरावात असलेल्या मागण्या सर्वांसमोर मांडण्यात आल्या. 1. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून ६ महिन्यात निकाल लावावा. २. मराठा आरक्षण मिळावे. 3. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावेत. 4. स्वामीनाथन आयोग लागू करावा. 5. अण्णासाहेब पाटील महामंडळाला ५ हजार कोटी रुपये द्यावेत. 6. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. 7. शाहू महाराजांच्या नावाने कौशल्य विकासासाठी स्वायत्त संस्था सुरु करावी. 8. शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी. 9. अरबी समुद्रातील शिवस्मारक २०१७पूर्वी पूर्ण करावे. 10. १४ डिसेंबरला नागपूरचा मोर्चा होईल. तो अधिवेशनावर काढण्यात येईल. त्यानंतर मुंबईच्या मोर्चाची तारीख ठरवली जाईल. मुंबईचा मोर्चा शेवटचे अस्त्र राहील. हा ठराव मांडल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या 11 जणांनी व्यासपीठावर येऊन मोर्चाच्या पुढील वाटचालीबद्दल मते व्यक्त केली. - हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, फक्त आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. - आजपर्यंत मोर्चात जी शिस्त होती. तशीच शिस्त पुढेही कायम ठेवावी - जगातला सर्वात मोठा, शांतीचे आणि शिस्तीचे प्रदर्शन घडविणारा हा मोर्चा आहे. - कधीही दगड उचलू नका, अहिंसेसारखी शक्ती नाही - नाशिक येथील भडक बातम्या येत आहेत, तरी सर्वांनी शांतता राखावी. मोर्चाचा संबंध याच्याशी कोणी जोडू नये, कोणाला जोडू देऊ नये, असा प्रयत्न कोणी विघनसंतोषी करू शकतात. यासाठी सर्वांनी सजग राहावे. - मुंबई अधिवेशनाआधी आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर 14 डिसेंबरला भव्य मोर्चा काढणार. - मुंबईचा मोर्चा आमचे ब्रम्हास्त्र असून शासनाने आमची दखल नाही घेतल्यास  मुबंईचे मोर्चाचे "विशेष" नियोजन सर्वांशी बोलून ठरविणार - आरक्षणाचा विशेष अभ्यास करण्यासाठी राज्यपातळीवरील तज्ज्ञांची समिती केली असून, ही समिती आरक्षण मागणीचा तांत्रिक मसुदा, मोर्चाला तयार करून देण्याचे काम करेल. या मागण्या सर्वांसमोर मांडण्यात आल्या. या ठरावाचे व मागण्यांचे वाचन मुलींनी व्यासपीठावर केलं

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Vasai Virar Rain News: नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती
Ketan Agrawal Siya Goyal Pune Lohagadh Case: चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget