एक्स्प्लोर

मोठी बातमी! 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार; सरकारच्या अडचणीत वाढ

जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा देखील जरांगे म्हणाले आहे.

रायगड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. आंतरवाली सराटीमध्येच हे आंदोलन होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. आमचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा देखील जरांगे म्हणाले आहे.

मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काही सहन करणार नाही. सगेसोयरेबाबत करण्यात आलेल्या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे. काही ठिकाणी काही दस्तऐवज  सापडत नाही असे सांगितले जात आहेत. ज्यांचा विरोध होत आहे, त्यांच्यासाठी हा कायदा नाही. गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे. त्यामुळे विचारवंतानी या कायद्यासाठी मत मांडावे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही.  गैरसमज करून घेवू नका. विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करावा. तसेच, 9 फेब्रुवारीपर्यंत नवीन अध्यादेशाची अमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

मला शंका सरकारबद्दलच आहे...

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,'सरकारची समिती काम करीत नाही. कुणाच्या दबावाखाली काम करू नका. सगेसोयऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र देण्यात यावेत. अर्ज दाखल करून देखील प्रमाणपत्र मिळत नाही. हैदराबाद गॅझेट देऊन चार दिवस झाले, मात्र अजूनही तो स्वीकारला नाही. राजपत्रीत अध्यादेश दिला असून, तो टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्येच दोन भुमिका दिसत आहेत. 10 तारखेला काढलेला अध्यादेश आम्ही मिडीयाला देणार असून, 10 फेब्रुवारीपासून परत अमरण उपोषण सुरू करणार आहे. 10 तारेखेला हरकतींचे 15 दिवस पुर्ण होत आहेत. मात्र, सरकारमध्येच अर्धे विरोधात आणि अर्धे पाठींबा देतांना पाहायला मिळत आहे. सरकारमधून दोन भुमिका येत असल्याने मी अमरण उपोषणावर बसणार आहे. दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नसून, मला शंका सरकारबद्दलच असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 

सरकारमधील दोन भुमिका पुढे येवू लागल्यात...

सराकारला एकच व्यक्ती हवा आहे. करोडो मराठे नको असतील, तर मी आंदोलनावर का बसू नयेत. आम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत काहीच बोलणार नव्हतो. पण, सरकारमधील दोन भुमिका पुढे येवू लागल्याने 10 फेब्रुवारीलाच आंदोलन सुरु करणार आहे. एकीकडे सरकारच्या शिष्टमंडळाकडून अध्यादेश दिला जातो, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. सरकारमध्येच दोन भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे संशय येत आहे. मी 10 तारखेला उपोषणाला बसणार असून, मागे हटणार नाही. गुलालाचा अपमान झाल्यास सरकारला जड जाईल. शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करीत नाही. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. खालचे अधिकारी ऐकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी सांगितल्यावर खाली हालचाल होते. गावात सापडलेल्या नोंदीची कागदपत्र ग्रामपंचायतीवर लावले पाहिजे. गुन्हे चार दिवसात मागे घेणार होते. आता तीन महिने होवून गेले, तरी मागे घेतले नाहीत.

अशी असणार आंदोलनाची दिशा...

10 फेब्रुवारीला आंतरवाली सराटीत आमच्या आभ्यासकांची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा आताही विश्वास आहे. पण ते अचानक भुमिका बदलतात. आता होणारे अमरण उपोषण हे शेवटचे असेल. एकदाच तुकडा पाडणार आहे. आंदोलनांचे सात टप्पे असणार असून, 9 तारखेला याची घोषणा करणार आहे. आज रायगडावर आलो असून, आता छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होईल की माहित नाही. आता लढा तीव्र असणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'जरांगे तू कोर्टात येच, दूध का दूध पानी का पानी होईल'; लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget