एक्स्प्लोर

Majha Katta : तेव्हा शरद पवारांनी आणि आता अजित पवारांनी चुकीचं केले - पन्नालाल सुराणा

समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची माझा कट्टावर मुलाखत घेण्यात आली.

Majha Katta :  समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची माझा कट्टावर मुलाखत घेण्यात आली. नुकताच त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला.. सत्तर वर्ष ते देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाच्या स्थितंतराचे साक्षीदार राहिले आहेत. चले जाव आंदोलनपासानू ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्वाचा अनुभव सुराणा यांच्याकडे आहे.  पन्नालाल सुराणा यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता.. त्यासोबतच त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवाबद्दल कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या...

जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं सामाजिक कामही मोठं आहे. मराठवाड्यात भुकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पन्नालाल यांनी सुरु केलेल्या आपलं घर मधून अनेक मुला-मुलींची आयुष्य घडली आहेत. त्याशिवाय भूमीहीन शेतकऱ्यांना जमीनी मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. समाजकारण आणि राजकारणामध्ये गुंतलेल्या व्यक्तीमध्ये लेखकही दडला आहे. ग्यानबाचं अर्थकारण हे त्यांचं पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारं ठरलेय.

पन्नालाल सुराणा यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सोव्हिएत संघटनेच्या विघटनानंतर विचारसणीचा काही उपयोग नाही, असे जगभरात वातावरण निर्माण करण्यात आले. पण जगामध्ये जी विषमता आहे, अन्याय होतोय, यामध्ये अनेकांचं जिवन खडतर होतोय, त्यामुळे विाचरसणीच्या आधारावर त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करावे लागतात.. आम्ही वयाच्या नवव्या वर्षांपासून यासाठी मेहनत घेतोय. 

समाजवादी चळवळ सध्या विस्कटली आहे. वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे समाजवादी चळवळ विस्कटली. काँग्रेसच्या बाहेर पडू नये असे अच्युतराव पटवर्धन यांचं मत होते, पण अशोक मेहता यांच्या आग्रहामुळे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेथूनच मतभेदाची सुरुवात झाली.  १९५२ च्या निवडणुकीत बसलेल्या फटक्याचा सर्वात जास्त परिणाम समाजवादी पक्षाला झाला.  काही जणांन राजकारण सोडले, तर काही जणांनी वेगळी चूल मांडली.

जनसंघासोबत वैचारिक मतभेद असतानाही काही जणांना त्यांच्यासोबत काम केले अन् काँग्रेस हटावचा नारा दिला. पण पूर्णपणे विचार न केल्याचा फटका बसला. ७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली, त्यावेळी जयप्रकाश यांच्या नेतृत्वात मोठा लढा देण्यात आला. बाहेरच्या दडपणामुळे इंदिरा गांधी यांन देशाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेणार हे माहित होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. जयप्रकाश यांनी दूरचा विचार केला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना जनसंघासोबत युती करायच नव्हती, पण काही नेत्यांनी जनसंघासोबत जायचा निर्णय घेतला. त्यामुळे सामाजिक चळवळ विस्कळीत झाली. दरम्यान,  सेवादलचं अध्यक्षपद आणि मराठवाडा वृर्तमानपत्राचे संपादकपद असल्यामुले मी राज्यपालपद नाकारले होते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

 
शरद पवार यांचं पुलोद सरकार कसे सत्तेत आले? त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीविषयी काय वाटतेय.. याबाबत बोलताना पन्नालाल सुराणा म्हणाले की, शरद पवार जेव्हा बंडखोरी करण्याचा विचार करत होते, तेव्हा गोविंद तळवळलकर यांच्याकडे शरद पवारांचा निरोप गेला. काही नेत्यांशी बोलायला सांगितलं. शरद पवार आणि तळवळलकर यांचे घनिष्ठ संबंध होते.  तळवळलकरांनी शरद पवार यांची एमएम जोशी आणि काही नेत्यांशी बैठक ठरवली. त्यावेळी पक्षाचं नुकसान होईल, असे मी ठरवलं होतं. पक्षाची इमेज पाळली पाहिजे, आपल्यामुळे पक्षाचं नुकसान झालं नाही पाहिजे. जनता पक्षातील नेते सत्तेवर जायल फार उत्सुक असतात. संधी मिळतेय तर जाऊयात असे त्यांचं मत होते. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्याचं समर्थन करायलाच हवं. त्यावेळी मला तो प्रयोग चांगला वाटला नव्हता.  आताही माझी भूमिका तशीच आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी खुनशीपणा केला. त्यावेळालाही चुकीचं झाले होतं आणि आजही चुकीचेचं झाले आहे. मुख्यमंत्री होणार हे ठरल्यानंतरच शरद पवार हे बाहेर पडले होते. त्या परिस्थित जनता पार्टीकडे मुख्यमंत्री सांभाळू शकेल असा नेत नव्हता, त्यामुळे एसएम जोशींनी शरद पवारांना पाठिंबा द्यायचा ठरवला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Embed widget