Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पाऊस उशीरा येणार, 11 जूनपर्यंत... हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज
Maharashtra Weather Update: कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्येही फारसा पाऊस नसेल. दरम्यान, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते.

मुंबई: केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, याबाबतची निश्चित तारीख भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची पावसाची प्रतीक्षा आणखी लांबत चालली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) गुरुवारी पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) (पूर्वानुमान) जाहीर केला आहे. त्यानुसार, ११ जूनपर्यंत महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात तसेच राज्याच्या अंतर्भागात अत्यंत अल्प पावसाची शक्यता आहे. या कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्येही फारसा पाऊस नसेल. दरम्यान, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते.(Maharashtra Weather Update)
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कुठे आणि कधी पाऊस होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत काही ठिकाणी दररोज १० मिलीमीटर इतका तुरळक पाऊस पडू शकतो. त्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजेच ४ ते ११ जून या कालावधीत किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढण्याची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची व्याप्ती वाढू शकते.(Maharashtra Weather Update)
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मे ते ३ जून दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये विस्तारू शकतात. तसेच, ४ ते ११ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update : देशातील १५ राज्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट
दुसरीकडे, हवामान विभागाने आज (शुक्रवार, २९ मे) देशातील १५ राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (अलर्ट) दिला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारसह अनेक भागांचा समावेश आहे. या परिसरात ताशी ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता असून, यामुळे देशातील काही भागांमध्ये तापमान कमी होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
पुढील काही दिवसांत वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. २९ ते ३१ मे दरम्यान उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील २ ते ३ दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने अलर्ट जारी केलेल्या १५ भागांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.
Before You Go
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
महत्त्वाच्या बातम्या




















