एक्स्प्लोर

सप्टेंबरच्या पावसाने दिलासा, अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ; मात्र गेल्या वर्षी 100 टक्के भरलेल्या उजनीत यंदा केवळ 33 टक्केच पाणी

मागील वर्षी उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार  आहे. 

मुंबई : जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ (Water Crisis) गाठू लागली. मात्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात उत्तरा नक्षत्रातील पाऊस धो-धो बरसल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.सप्टेंबर महिन्यात झालेल्या चांगल्या पावसानं महाराष्ट्रातील धरणक्षेत्रातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे पाहावयास मिळाले आहे.

उजनीत यंदा केवळ 33 टक्केच पाणी 

जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली.  आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील धरणक्षेत्रात 73.56 टक्के पाणीसाठा झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी राज्यातील धरणक्षेत्रात 64.77 टक्के पाणीसाठा होता. उजनी धरणात 4 सप्टेंबर रोजी 17 टक्के पाणीसाठा होता तोच आज 33 टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, मागील वर्षी उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार  आहे. 

जायकवाडीत  धरणात 44.34  टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत  धरणात 44.34  टक्के पाणीसाठा आहे.  मागील वर्षी याचवेळी 99.71  टक्के जलसाठा होता . औरंगाबादेतील धरणक्षेत्रात सर्वात कमी पाणीसाठा आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 38.67  टक्के पाणी आहे.  मागच्या वर्षी औरंगाबाद विभागात 86.11 टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील धरणक्षेत्रात 89.54 टक्के पाणीसाठा आहे.  अमरावती विभागात 81.17  टक्के, नाशकात 76.02 टक्के, तर पुण्यात 77.47  टक्के पाणीसाठा आहे.  कोकणात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  कोकण विभागात यंदा 94.29  टक्के पाणीसाठा आहे.  मागच्या वर्षी 90.30  टक्के जलसाठा आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कोकण वगळता  सर्व विभागांतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. मराठवाडा, विदर्भातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा आहे. परिस्थिती गंभीर नसली तरी पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात होणार आहे. 

हे ही वाचा :

महाराष्ट्रात एक जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद, तर देशात एकूण सरासरीच्या 94 टक्के पाऊस

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget