एक्स्प्लोर

RTE : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी झुंबड! राज्यभरातून अडीच पट अधिक अर्ज, ठाण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्गात सर्वात कमी

RTE School Admission: मागच्या वर्षी कोरोनामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना पहिल्या वर्गात दाखल केले नाही. शासनाने वयोमर्यादा वाढविल्याने RTE अंतर्गत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे

Maharashtra RTE School Admission : आर्थिक आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत 10 मार्च रोजी संपली आहे. विशेष म्हणजे या वर्षी राखीव असलेल्या 1 लाख 2 हजार 22 जागांसाठी तब्बल 2 लाख 85 हजार 275 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खाजगी शिक्षण संस्थांची दारं आर्थिक आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी खुली व्हावी यासाठी सरकारने 2009 साली RTE म्हणजेच Right to Education हा कायदा तयार केला. सुरुवातीला या योजनेचा फायदा कसा घ्यावा याची फारशी माहिती पालकांना नव्हती मात्र आता ही परिस्थिती पार बदलली आहे. सरकारने वर्तमानपत्र, टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने लोकं आता मोठ्या प्रमाणात या योजनेच्या फायदा घेण्यासाठी अर्ज करत असल्याचं मत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केलं आहे. 

2022-23  या शैक्षणीक वर्षासाठी राज्यात तब्बल 2 लाख 85 हजार 275 अर्ज दाखल करण्यात आले आहे. या वर्षी उपलब्ध असलेल्या 1 लाख 2 हजार 22 जागांपेक्षा अडीच पट प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे. लोकांमध्ये आलेल्या जागृती सोबतच मागच्या वर्षी कोरोना मुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना पहिल्या वर्गात दाखल केले नाही. अशा मुलांसाठी शासनाने वयोमर्यादा वाढविल्याने देखील RTE अंतर्गत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे. यावर्षी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 25 हजार 702 अर्ज दाखल कऱण्यात आले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी म्हणजे 193 अर्ज आले आहेत. राज्यातील सर्वात मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून 769 अर्ज तर चंद्रपूर जिल्ह्यातून 3 हजार 921  अर्ज दाखल करण्यात आले आहे.

RTE अंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्याने अनेक पात्र विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आल्याने लॉटरी सिस्टमने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मात्र या प्रकारे निवड झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नसलेले पालक या योजनेचा फायदा घेतात असा खाजगी संस्था चालकांचा आक्षेप आहे.

चंद्रपूरच्या महर्षी विद्या मंदिरचे संचालक गिरीश चांडक यांनी याबाबत आपलं अतिशय स्पष्ट मत नोंदवलं आहे. चांडक यांच्या मते शासनाने पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी 1 लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट टाकली असली तरी या योजनेचा फायदा घेणारे 50 टक्के पालक देखील अशे नाही ज्यांचं उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे. शाळांकडे पालकांचे उत्पन्न तपासण्याचे कुठलेच अधिकार नाही, त्यामुळे सरकार म्हणेल त्या मुलांना आम्हाला  अॅडमिशन द्यावी लागते. त्यामुळे RTE अंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेत कार नी येत असल्याचं विरोधाभासी चित्र पाहायला मिळतं.

सरकारी प्रयत्नांमुळे लोकांमध्ये RTE बद्दल जागरूकता निर्माण झाली ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र त्याच वेळी आर्थिक आणि दुर्बल घटकातील पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची निवड योग्य पद्धतीने होणे देखील आवश्यक आहे. अन्यथा गरीब विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget