एक्स्प्लोर

Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गावरील अपघात चिंतेचा विषय, मात्र यावर मार्ग कधी निघणार?

Samrudhhi Highway : समृद्धी महामर्गावरील अपघातांसदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून यावर तोडगा कधी काढणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Samrudhhi Highway :  समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांवर  (Accident) अनेक उलगडे होत आहेत. मात्र जास्तीत जास्त अपघात हे वाहन चालकाला झोप लागणे किंवा वाहन चालक रोड हिप्नोसिसचा शिकार झाल्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे. पण एवढं सगळं समोर आलं असताना यावर सरकार कोणतीही उपाययोजना करताना दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. 

विदर्भाला राजधानी मुंबईशी जोडण्यासाठी  महत्त्वाकांक्षी असलेला हा समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा महामार्गाची ओळख आता मृत्यूचा सापळा म्हणून ओळख व्हायला लागली आहे.  नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना वाहन चालक हे रोड हिप्नोसिसचे शिकार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. 

मागील आठवड्यात बुलढाण्यातील खालगी लक्झरी बसला झालेल्या अपघातानंतर अनेक अहवाल समोर आले होतं. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे अपघाताचे कारण हे  रोड हिप्नोसिस देण्यात आले होते. वाहन चालक सलगपणे वाहन चालवताना रोड हिप्नोसिसचा शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. त्यामुळे चालकाला डुलकी येणे किंवा  झोप येणे हे स्वाभाविक आहे.  अपघातांचे प्रमाण देखील वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

या महामार्गावर वाहन चालवत असताना " ब्रेक थ्रू जर्नी " आवश्यक आहे. त्यासाठी वाहन चालकांना थांबण्यासाठी जागा किंवा फ्रेश होण्यासाठी रोडसाइड अॅमेनिटीची आवश्यकता आहे. असं जरी तज्ज्ञ सांगत असले तरी मात्र सरकारला या गोष्टीची जाणीव नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यात घडलेले अपघात

या महामार्गावर गेल्या सहा महिन्यात जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे.

सरकारकडून दुर्लक्ष? 

सरकारकडून  समृद्धी महामार्गावर रोडसाइड अमेनिटीज बनवण्यासाठी आतापर्यंत तीनदा टेंडर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तीनही टेंडर हे प्रशासकीय कारणावरून रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.  इतकंच काय तर बुलढाण्यात खाजगी बसचा अपघात झाल्या नंतर सरकार ने  दुसऱ्याच दिवशी सरकारने चौथ टेंडर काढल्याची माहिती देखील मिळाली पण हे टेंडर पाच दिवसांनी प्रशासकीय कारणावरून रद्द करण्यात आल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबईतील एका कंपनीला हे टेंडर देण्यात आलं होतं आणि ते मंजूर देखील करण्यात आलं होतं. 

समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी मात्र यावरील होणाऱ्या अपघाताच प्रमाण बघता आता तरी सरकारने जागे होणे आवश्यक आहे.  या महामार्गावर जर सोयीसुविधांसाठी तीन वेळेस टेंडर निघून रद्द होत असेल तर हे नेमकं कशासाठी होत असेल हा प्रश्न देखील आता नागरिकांच्या मनात उपस्थित केला जात आहे. 

हे ही वाचा: 

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, फूड मॉलसाठी निविदा मागवल्या

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget