एक्स्प्लोर

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Maharashtra Rain News : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी  जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. 

जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहण्याचा अंदाज

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते. 

जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

1 जून ते 7 जुलैपर्यंत देशात सरासरीच्या फक्त 89 टक्केच पाऊस 

1 जून ते 7 जुलैपर्यंत देशात सरासरीच्या फक्त 89 टक्केच पाऊस पडला आहे. तर राज्यात सरासरीच्या 101 टक्के पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे 7 जुलैपर्यंत राज्यात 277.7 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यात झालेल्या चांगल्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात राज्यात 279.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागवार आकडेवारी पाहायची तर कोकणात सर्वाधिक 1 जूनपासून सरासरीच्या 117 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात 1 जूनपासून सरासरीच्या 107 टक्के नोंद झाली आहे. जून महिन्यातील कमी पावसाची कसर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूर्ण झाली आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती ओढवण्याची शक्यता आहे. ऐन जुलै महिन्यात अद्याप मोठा पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात होताना दिसलेला नाही. विदर्भात सरासरीच्या फक्त 89 टक्के पाऊस झाला आहे तर मराठवाड्यात सरासरीच्या फक्त 71 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, 8 जुलैनंतर पावसाची तीव्रता राज्यात कमी होणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या:

महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Akhilesh Yadav: 'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
Uddhav Thackeray: राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'
राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget