एक्स्प्लोर

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं राज्यातील काही भागात पूरस्थिती, तर कुठं जनजीवन विस्कळीत; आजही मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील काही भागात पावसानं हाहाकार घातला आहे. जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Maharashtra Rain : राज्यातील काही भागात पावसानं हाहाकार घातला आहे. जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही भागात शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसत आहे. तर काल रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथंही पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच भिवंडी परिसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पूरस्थिती

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. संग्रामपूर तालुक्यातील पांडव नदीला पूर आला आहे. या पुरात शेतातून घरी येण्यासाठी निघालेले मुलगा आणि वडील पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, मुलाला गावातील नागरिकांनी पुरतून बाहेर काढलं 

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळं धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63  मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी 126.602 मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. त्यामुळं लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती

यवतमाळच्या महागाव तालुक्यात आजपर्यंत असा पाऊस कधीच बरसला नाही. पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनंतवाडी गावाला पुराचा वेढा पडला आहे. जीव कसा वाचवायचा कसा असा प्रश्न पाणी वाढल्यावर पडत होता. अनंतवाडी या गावातील जवळपास 20 घरे वाहून गेली आहेत. शासनाने हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला मात्र खराब वातावरणाने होऊ शकले नाही. जनावरे वाहून गेली आहेत. आता परत आल्यानंतर कसे जगावे असा प्रश्न पडला आहे. sdrf पथकाने बोटीच्या सहाय्याने 110 नागरिकांना रेस्क्यू केले आहे. अनंतनगर येथील मंदिरात त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरुन जात असल्यानं वनसडी-अंतरगाव आणि भोयगाव-धानोरा मार्ग बंद, पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परसोडा, रायपुर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव, भोयगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अकोला जिल्ह्यातील आगर गावाला पुराचा विळखा

अकोला जिल्ह्यातील आगर गावाला मोर्णा नदीच्या पुरानं विळखा घातलाय. रात्री गावातील नदीच्या पुलावरून जवळपास 15 फुट पाणी वाहत होते. त्यामुळं तेथील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Weather Update : देशातील विविध राज्यात आज वादळी पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
Embed widget