एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 तालुके निर्मितीचा प्रस्ताव, महसूलमंत्र्यांची माहिती

Maharashtra News : नवीन जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर त्या त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्मितीच्या प्रस्तावावर विचार करता येईल असं महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.

चंद्रपूर : राज्यात नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र जोपर्यंत जनगणनेची आकडेवारी येत नाही तोपर्यंत त्यावर निर्णय घेता येणार नाही अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नवीन लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्यावर विचार करता येईल असंही ते म्हणाले. चंद्रपुरात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे?

राज्यात 81 नवीन तहसील आणि 20 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. पण जोपर्यंत नवीन जनगणना येत नाही, तोपर्यंत हे करता येणार नाही. मात्र नवीन जनगणनेची आकडेवारी आली की भौगोलिक परिस्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नवीन जिल्हे आणि तालुके तयार करण्याची प्रक्रिया प्रशासनिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक कारणांवर आधारित असते. खाली मुख्य कारणे खालीलप्रमाणे,

1. प्रशासनिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी

मोठ्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात प्रशासन कार्य करणे अवघड होते.

नवीन जिल्हा/तालुका तयार करून कायदे, पोलीस, महसूल यांचे काम अधिक जलद व प्रभावी करता येते.

सरकारी योजना आणि सेवांचा अधिक परिणामकारक वितरण होतो.

2. लोकसंख्या वाढ

एखाद्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील लोकसंख्या खूप वाढल्यास, प्रशासन आणि विकासासाठी वेगळ्या विभागाची आवश्यकता भासते.

नवीन जिल्हा/तालुका बनवल्याने लोकांच्या अडचणी कमी होतात.

3. भौगोलिक कारणे

मोठ्या भौगोलिक विस्तारामुळे प्रवास वेळ जास्त लागतो.

दुर्गम भाग किंवा पर्वतीय, नदीकिनारी, जंगल क्षेत्रात नवीन तालुका तयार करून प्रशासन जवळ नेले जाते.

4. आर्थिक आणि विकासात्मक कारणे

नवीन जिल्हा/तालुका तयार केल्याने स्थानिक विकासाचा वेग वाढतो, नवीन कार्यालये, रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स मिळतात.

अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासासाठी नवीन प्रोत्साहने मिळू शकतात.

5. सामाजिक आणि राजकीय कारणे

एखाद्या भागात सांस्कृतिक, भाषिक, जातीय किंवा ऐतिहासिक वैशिष्ट्य असल्यास, वेगळा प्रशासन निर्माण करून स्थानिक हित साधता येते.

स्थानिक लोकांच्या राजकीय प्रतिनिधित्वात सुधारणा करता येते.

नवीन जिल्हे/तालुके तयार करण्यामागचे मुख्य उद्देश प्रशासनिक कार्यक्षमता, लोकसंख्या नियंत्रण, भौगोलिक सुविधा, आर्थिक-विकासात्मक प्रगती, आणि सामाजिक-राजकीय गरजा यांना पूर्ण करणे असते.

Process Of New Districts Formation : नवे जिल्हे आणि तालुके निर्मितीची प्रक्रिया

प्रस्ताव सादर करणे: स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा स्थानिक विकास समितीच्या माध्यमातून प्रस्ताव तयार केला जातो.

प्रस्तावाचा अभ्यास: राज्य महसूल विभाग किंवा संबंधित विभाग प्रस्तावाचा अभ्यास करतो.

मंजुरी प्रक्रिया: राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जातो.

राजपत्रात अधिसूचना: मंजुरी मिळाल्यानंतर, राज्य राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली जाते.

अंमलबजावणी: नवीन जिल्हा किंवा तालुक्याच्या प्रशासनिक यंत्रणेची स्थापना केली जाते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
Embed widget