एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : '..म्हणून पंतप्रधान हवं त्यांना भारतरत्न देत आहेत', उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : नुकताच देशातील दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केलेत.

Uddhav Thackeray : नुकताच देशातील 3 दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) जाहीर झाला. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटंलय. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. 

 

"जिवंत असताना त्यांना विरोध तुम्ही केला" - उद्धव ठाकरे

भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की करपुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला, आता बिहारध्ये मत हवे म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात,  तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती एम.एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही.'

 

'आज काल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का?'

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपकडे करोडो रुपये आहेत, 1300 कोटी भाजपला मिळाले आहेत, भाडोत्री लोक खूप आहेत, भाडे मिळाले की काहीही मिळते, आजकाल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का? पण मोदी सरकार जो खर्च करत आहेत तो पैसा भारत सरकारचा नाही का? एका शेतकऱ्याने सांगितले आहे, की मी कुटुंबासह आत्महत्या करेन पण मोदींना मत देणार नाही.

 

'प्रश्न विचारले तरी, पाकिस्तानात जा म्हणायचे'

उद्धव ठाकरे पंतप्रधानावर टीका करत म्हणाले, नेहरू जाऊन आता 60 वर्ष झाली, नेहरू किती काळ सतेत होते? त्यानंतर व्ही पी सिंग, वगैरे होते, त्यांचे काय, मोदी तुम्ही 10 वर्ष, अटलजी यांची 5 वर्ष, जनता पक्षाची वर्ष मिळून तुम्ही जास्त काळ सत्तेत आहात, सगळे काही प्रश्न दुसऱ्यावर टाकायचे आणि तरी प्रश्न विचारले तरी पाकिस्तानात जा म्हणायचे. हा जो राज्यकर्ता आहे तो नालायक आहे, असे मला म्हणावे लागेल, हा माझा अधिकार आहे, त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळाला नाही.

 


"धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे"

उद्धव ठाकरे म्हणतात, माझ्यासोबत मला सोन्यापेक्षा चांगली माणसं मला हवी आहेत, ही जी लोकं एकडे बसली आहेत, ती सोन्यापेक्षा चांगली आहेत, ती मला हवी आहेत, अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्या सोबत येत आहेत, घरी घेऊन भेट देत आहेत, मी कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी आमच्या सोबत का येता? असं मी त्यांना विचारलं, पण यावर त्यांचे म्हणणे आहे की तुमचे आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे, त्यांचे हिंदुत्व घर मोडते, माझ्या आजोबांचे म्हणणे होते माणसाने धर्म बनवला आहे, धर्माने माणूस बनवला नाही, तुम्ही जे काही करत आहात ते पाप आहे. हे विषय लोकांपर्यंत पोचायला हवी, तुम्ही जाऊन लोकांशी बोलायला हवे, मी RSS च्या लोकांना विचारतो की, तुम्ही याच साठी केला होता का अट्टाहास? हे उपरे आता बसवले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे, त्या ध्वजावरून आता आपल्याच धर्माचे रक्त ठिबकत आहेत, अजूनही माझ्या पक्षात जे भेकड आहेत त्यांनी आताही त्यांच्याकडे जावे, मला गरज नाही, मूठभर मावळे चालतील, तुम्ही देखील जिवंत मावळे आहात, लोकाधिकार यांनी जे हातात घेतले, ते सोडत नाहीत, त्यामुळे तुमच्यावर मला विश्वास आहे

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Latur Municipal Election 2026: भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
Embed widget