एक्स्प्लोर

Deepali Syed  : अभिनेत्री ते राजकारणी, कोण आहेत दीपाली सय्यद? जाणून घ्या प्रवास 

Deepali Syed  : दीपाली सय्यद यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला.  त्यांच्या राजकीय प्रवेशापासून ते आडनावापर्यंत त्या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. दीपाली भोसले ते दीपाली सय्यद हे आडनाव बदलण्यामागचं नेमकं कारण काय यावर आजवर अनेक चर्चा होत आल्या.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमध्ये अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक नवीन चेहरा देखील समोर आला आहे, तो म्हणजे शिवसेना नेत्या दीपाली भोसले- सय्यद (Deepali Syed ). दीपाली सय्यद यांच्या सय्यद या आडनावाचीच सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आडनावापासून ते राजकारणापर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना उलघडली आहेत.  

सिनेसृष्टीतून लोकप्रिय झालेला चेहरा राजकारणात सक्रीय होतो त्यावेळी आपसूकच त्यांनी केलेली वक्तव्य काळजीपूर्वक ऐकली जातात. दीपाली सय्यद यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला.  त्यांच्या राजकीय प्रवेशापासून ते आडनावापर्यंत त्या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. दीपाली भोसले ते  दीपाली सय्यद हे आडनाव बदलण्यामागचं नेमकं कारण काय यावर आजवर अनेक चर्चा होत आल्या. पक्षांप्रमाणे आणि निवडणुकांमुळे वेळोवेळी त्यांनी आडनाव बदललं असे देखील तर्क लावण्यात आले. पण यामागचं तत्थ्य काय? म्हणजे आधी दीपली भोसले आणि नंतर दीपाली सय्यद असं का? हे स्वतः दीपाली सय्यद यांनीच सांगितलंय. 

मुंबईत जन्म 

मुंबईच्या कुर्ल्यात जन्म घेतलेली मराठमोळी अभिनेत्री दीपाली भोसले. दीपाली भोसलेंचं संपूर्ण बालपण  मुंबईत गेलंय. दीपाली यांनी नालंदा विद्यापिठातून फाइन आर्टसची पदवी घेतली. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात ही अभिनय क्षेत्रातून झाली. अभिनय क्षेत्रातलं त्यांचं पदार्पन मराठी मालिकांमधून झालं. मराठी कलाविश्वात त्यांना खरा ब्रेक मिळाला ते बंदीनी आणि समांतर या मराठी मालिकांमधून. त्यानंतर त्यांचा प्रवास सुरु झाला तो मराठी चित्रपट, मालिका, टीव्ही शोज, जाहीरात क्षेत्रांपर्यंत. या सगळ्यातून दीपाली या खऱ्या अर्थाने लोकप्रियता केव्हा मिळाली तर ती जत्रा चित्रपटातल्या ये गो ये मैना या गाण्यानंतर. या गाण्यातून दीपाली या घराघरात पोहचल्या. 

...म्हणून राजकारणात प्रवेश 

दीपाली यांच्याबाबतचा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे मराठी सिनेसृष्टीतून दिपाली यांनी राजकारणात येण्याचं कारण काय? याबाबत बोलताना त्या सांगतात, "मला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. त्या समस्या मी माझ्या परीने सोडवू शकले तर मला आनंद मिळेल. एक अभिनेत्री म्हणून मला काही मर्यादा आहेत. त्यामुळे सामान्यांच्या सगळ्याच प्रश्नांना तेवढा न्याय देऊ शकेन असं वाटलं नाही. त्यामुळे राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 

"राजकारणात आले तर सामान्यांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवता येतील. शिवाय महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न मांडून समाजात बदल घडवून आणता येईल असं वाटलं. समाजात महिला अजूनही सुरक्षित नाहीत. मी स्वतः राजकारणात असून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं, आडनावाबद्दल बोललं जातं. तर सामान्य महिलांचं काय? त्यांच्या सुरक्षेचं काय? याच सगळ्या प्रश्नांवर काम करता यावं यासाठी मी राजकारणात प्रवेश केला, असं दीपाली यांनी सांगितलं. 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही 

अभिनय क्षेत्रातून राजकारणात येत असताना दीपाली सय्यद यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.  2014 ला राजकारणात नवख्या असलेल्या दीपाली यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी  आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात फारशी चर्चा नव्हती. 2014 लाच त्यांनी आपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत  त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दीपाली यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी देखील त्या जास्त चर्चेत नव्हत्या. 

शिवसेनेत प्रवेश
दीपाली सय्यद राजकारणात खऱ्या चर्चेत आल्या ते  2019 मध्ये.  2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातावर शिवबंधन बांधून घेतले. 3 ऑक्टोबर 2019 या दिवशी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.  त्यानंतर लगेच झालेलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ठाण्यातील कळवा मुंब्रामधून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दीपाली सय्यद पराभूत झाल्या. त्यावेळी देखील या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.  

भोसले ते सय्यद प्रवास कसा झाला?
 
सय्यद या आडनावाबाबत सांगताना दीपाली म्हणाल्या, "एखाद्या मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलतं, अगदी तसंच माझं आडनाव बदलंलय. लग्नापूर्वी दीपाली भोसले असं नाव होतं. परंतु, लग्नानंतर दीपाली सय्यद असं झालं. म्हणजेच त्यांच्या पतीचं आडनाव त्यांच्या नावापुढे लागलं. दीपाली सय्यद यांचं लग्न सन 1998 मध्ये झालं. त्यांना 22 वर्षाचा एक मुलगा असून तो सिडनीत आपलं शिक्षण घेत आहे.  

सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याचा आरोप
दीपाली यांच्या सोफिया या नावाची देखील सतत चर्चा होत असते. कारण 2019 च्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी 'सोफिया जहांगीर सय्यद' या नावाने होर्डिंग्ज लावून प्रचार केला होता. त्यामुळे सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. "सोफीया हे नाव लग्नानंतर  पतीने प्रेमाने ठेवलंय. त्यामागे कोणतंही राजकारण नाही. भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मुलीचं इच्छेप्रमाणे जसं नाव बदललं जातं अगदी तसच सोफिया हे नाव ठेवलं आहे, असे दीपाली यांनी सांगितले.  

पूरग्रस्तांना मदत 
कोल्हापूर आणि सांगलीत 2019 ला आलेल्या महापुरावेळी दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. पूरग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी दीपाली सय्यद यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता.  शिवाय कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करुन त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. या मदतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.
 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget