एक्स्प्लोर

फडणवीसांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांचे कनेक्शन कट; भाजप आमदाराकडूनच पोलखोल

Farmers Electricity Connection: वीज बिल भरून देखील शेतकऱ्यांचे कनेक्शन खंडीत केले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.

Aurangabad News: ज्या शेतकऱ्यांनी चालू विज बिल भरलेलं असेल त्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन (Farmers Electricity Connection) तोडू नये असे आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र फडणवीस यांच्या आदेशानंतर देखील महावितरणाकडून वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिली आहे. तर याबाबत लक्ष घालण्याची विनंती आपण फडणवीस यांच्याकडे केली असल्याचं देखील लोणीकर म्हणाले आहेत. 

याबाबत लोणीकर यांनी फडणवीसांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर,  मूग उडीद मका, बाजरी आदी पिके अक्षरशः सडली आहे. त्यामुळे शेतकरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा कापूस उसाची चुकारे येणे बाकी असून, दुसरीकडे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातील विज कापत आहे. ज्यांनी वीज विल भरली आहे, त्यांची देखील वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे. बहुतांश ठिकाणी गावची गाव आणि ट्रान्समिटर बंद करण्यात येत असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. 

वीज भरूनही कनेक्शन खंडित...

तर पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले की, शेतीपंपाच्या थकित वीजबिल वसुलीला फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे. किमान एक बिल भरणाऱ्या शेतकऱ्याची वीज कनेक्शन बंद करू नयेत अशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने घेतला आहे. मात्र असे असतांना देखील वीज वितरण कंपनी  गावेच्या गावे वीज बिल वसुलीसाठी बंद करत आहेत. ज्यांनी वीज बिल भरले आणि ज्यांनी नाही भरले असे सरसकट वीज बंद करण्यात येत असल्याचं देखील लोणीकर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे पैसे येईपर्यंत वेळ द्यावी...

तर पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, वीज कंपनीच्या या कारवाईमुळे सद्यस्थितीमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वीज कंपनीने कनेक्शन कापल्याने शेतकऱ्याच्या शेतात उभा असलेला गहू, ज्वारी व इतर फळ पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घ्यावी. तर आम्हाला अपेक्षा आहे आपण सदैव शेतकऱ्यांचे नेते असून, विद्यमान राज्याचे सरकार हे गतिमान सरकार आहे. त्यामुळे आपण निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन वीज वितरण कंपनीला आदेश देऊन, चालू बाकी भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ऊस कपाशीचे पैसे येईपर्यंत वेळ देण्याचा निर्णय घेताल अशी अपेक्षा असल्याचं लोणीकर म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget