एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon Session: विधिमंडळाचे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार; आजच अधिवेशन संपणार असल्याची होती चर्चा

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे अधिवेशन पूर्वनियोजित वेळेनुसार 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र, कामकाजाला दोन दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Session :  राज्यात सध्या पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Updates) असून, राज्यातील अनेक भागात याचा परिणाम पहायला मिळत आहे..मुंबईसह कोकणात पडणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला देखील बसणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र अधिवेशन ठरलेल्या तारखेला संपणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पण अधिवेशन लवकर संपवा ही चर्चा अचानक सुरू झाली होती.

राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू झाले असून, अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्याच दिवसांपासून शांततेत सुरू असलेले हे अधिवेशन लवकर गुंडाळले जाईल अशी चर्चा गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाली होती. काही आमदारांनी तशी मागणीही केली होती. भाजप आमदार संजय कूटे यांनी तर आपण तशी विनंती सभागृहात करणार असल्याचे माध्यमांना सांगून टाकले.

अधिवेशन लवकर  संपवण्याची चर्चा का?

राज्यातील अनेक भागात सध्या पूरस्थिती आहे. ज्या भागात पूरस्थिती आहे त्या भागातले आमदार, पालकमंत्री अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशन सुरू असल्याने अधिकारीही अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशनामुळे इतर यंत्रणावर ताण पडत असल्याने अधिवेशन संपवून ही यंत्रणा पूरस्थितीसाठी कामाला लावावी अशी आमदारांची मागणी होती. 

दरम्यान एकिकडे अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मात्र सरकारवर टीका करत अधिवेशन न संपवण्याची मागणी केली होती. 
मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. 

सकाळपासून सुरू असलेल्या चर्चेला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळाला. दुपारी तीन वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अधिवेशन 4 ऑगस्ट रोजी संपणार असल्याची माहिती समोर आली. सोमवार आणि मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाला सुट्टी जाहीर करण्यात आली. शनिवार आणि रविवारी विधिमंडळाचे कामकाज बंद असते. आता, सोमवार आणि मंगळवारदेखील सुट्टी देण्यात आली. राज्यातील पावसाची परिस्थिती बघता सर्व आमदारांना शनिवार ते मंगळवार आपल्या मतदारसंघात या निमित्ताने जात येणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget