Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारची जवळपास  दहा जणांना धडक, तीन गंभीर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 26 Jan 2022 08:05 PM
पुण्यातील कात्रज जवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुण्यातील कात्रज जवळ असलेल्या बोगद्याजवळ पुन्हा अपघात झाला असून या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडीच्या  दरीपूलजवळ हा अपघात झाला असून या अपघातात  कंटेनर आणि चारचाकी गाडी एकमेकाला धडकले आणि हा  भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती. बुझवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, कंटेनर चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि. याचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यपालांकडे धाव
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यपालांकडे धाव घेतली आहे.  पत्र लिहित आंदोलनात हस्तक्षेप करण्याची मागणी, सोबतच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळही मागितली आहे. मागील ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, मागील अनेक दिवसात कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढले, कर्मचारी कामावर परतत नसल्यानं महामंडळाकडून निलंबन आणि बडतर्फच्या कारवाया देखील सुरुच आहे. 

 

मागील एका महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासर्व घडामोडीत एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने ‘लढा विलिनीकरण टीम महाराष्ट्र राज्य’ यांच्याकडून थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्टिकल २१३ आणि ३११ (२) अंतर्गत आंदोलनात हस्तक्षेप करत काही ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.  
मुंबई गुन्हे शाखेनं दोन हजार रुपयांच्या २५ हजार बनावट नोटा केल्या जप्त

मुंबई गुन्हे शाखेनं दोन हजार रुपयांच्या २५ हजार बनावट नोटा केल्या जप्त. सात कोटी रुपये इतकी नोटांची किंमत

पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारची जवळपास  दहा जणांना धडक, तीन गंभीर

पालघर चिंचणी बीचवर भरधाव कारने जवळपास  दहा जणांना उडविले असून पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर बोईसर मधील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

मुंबईत पाच मजली बिल्डिंग कोसळली, पाच लोक अडकल्याची भीती

मुंबईतील वांद्रे येथील बेहराम नगरमधील पाच मजली इमारत कोसळली असून त्यामध्ये पाच जण अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि सहा अॅम्ब्युलन्स पोहोचल्या आहेत. 

मुंबई - वांद्रे येथे ग्राउंड + 4 ची इमारत कोसळली

मुंबई -  वांद्रे येथे ग्राउंड + 4 ची इमारत कोसळली आहे. चार वाजताच्या आसपास ही घटना घडली आहे.  घटनेची माहिती मिळताच अग्निशामनदलाच्या चार आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचल्या आहेत. पाच ते सहा लोक अडकण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.  

मुंबई - वांद्रे येथे ग्राउंड + 4 ची इमारत कोसळली

मुंबई -  वांद्रे येथे ग्राउंड + 4 ची इमारत कोसळली आहे. चार वाजताच्या आसपास ही घटना घडली आहे.  घटनेची माहिती मिळताच अग्निशामनदलाच्या चार आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचल्या आहेत. पाच ते सहा लोक अडकण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.  

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, सौम्य लाठीमार

मुंबई पोलिसांनी मार्वे, मालवणीकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. आंदोलकांना अथर्व कॉलेजच्या जंक्शनवरच अडवलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. 

मालाडमधील क्रिडा संकुलनाला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपचा विरोध

मालाडमधील क्रिडा संकुलनाला टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध असून या ठिकाणी मोठा गोंधळ सुरु आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. 

...जेव्हा बीडचे आमदार झाडावर चढतात
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांनी सकाळपासूनच आंदोलन सुरू केलं होतं. पगारवाढ आणि कामावरून कमी केलेल्या महिलांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं, अशी मागणी या महिलांची होती.

 

आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने दोन महिला चक्क झाडावर चडल्या त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे  प्रयत्न सुरू होते. तेवढ्यात त्या ठिकाणी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप शिरसागर हे या आंदोलकांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. खुद्द पालकमंत्री या आंदोलक महिलांची समजूत काढत होते. मात्र या महिलानी आम्हाला वेतन वाढ द्या आणि कामावरून कमी केलेल्या लोकांना त्वरित कामावर रुजू करावं, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

 

हा सर्व प्रकार सुरू असताना आमदार संदीप शिरसागर हे या महिलांना खाली उतरण्यासाठी झाडावर चढले चक्क दहा मिनिटं झाडावर चढून उभा राहिलेल्या आमदार संदीप शिरसागर यांनी या महिलांची समजूत काढली आणि त्यांना खाली उतरवलं.
राज्यात शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयंही सुरु, एक फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरु होणार

राज्यात शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयंही सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आला आहे. राज्यात एक फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरु करण्यात येणार आहेत. पण कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल. दरम्यान, कोरोनाची स्थिती पाहून स्थानिक प्रशासन आणि विद्यापीठांना महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांच्या 15 फेब्रुवारीपर्यंत नियोजित सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. आणि 15 फेब्रुवारीनंतरच्या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईनचा निर्णय स्थानिक  प्रशासनाला घेण्याचे अधिकार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दिले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसणार देशाचे सामर्थ्य, राजपथावरील परेडची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर


73th Republic Day Parade : 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाय लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत. राजपथावरील संचलनाबाबत वाचा सविस्तर.


ध्वजारोहणानंतर हवाई दलाचे चार हेलिकॉप्टर राजपथवरील आकाशात झेपावतील. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर परेड कमांडर लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा राजपथवर पोहोचतील. परेडचे सेकंड इन कमांड मेजर जनरल आलोक कक्कर यांच्या आगमनानंतर परेडची विधिवत सुरुवात होईल. या वर्षीपासून परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी 10 वाजता सुरू व्हायची. मात्र, हवामानामुळे परेड अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील. यानंतर लष्कराचे 61 घोडदळाचे तुकडी दाखल होईल.


भारतीय लष्कराचा यांत्रिकी ताफा 
यंदाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसणार आहेच शिवाय 1971च्या युद्धात पाकिस्तानची दैना करणारे विंटेज रणगाडे आणि तोफांचे दर्शन घडणार आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवणारे PT-76 आणि सेंच्युरियन रणगाडे राजपथावरील परेडमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतील. हा विंटेज टँक आता लष्कराच्या युद्ध ताफ्याचा भाग नाही आणि त्याला खास संग्रहालयातून परेडसाठी बोलावण्यात आले आहे. नुकतेच देशात 1971 च्या युद्धाचे सुवर्ण विजय वर्ष साजरे झाले. याशिवाय 75/24 विंटेज तोफ आणि टोपाक आर्मर्ड पर्सनल कॅरियर व्हेईकल देखील परेडचा भाग असेल. 75/24 तोफ ही भारताची पहिली स्वदेशी तोफ होती आणि तिने 1965 आणि 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. यासह आकाशात हेलिकॉप्टरचे डायमंड फॉर्मेशन दिसेल.



विंटेज मिलिटरी हार्डवेअर व्यतिरिक्त, आधुनिक अर्जुन टँक, BMP-2, धनुष तोफ, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, सावत्रा ब्रिज, टायगर कॅट मिसाइल आणि तरंग इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसह एकूण 16 यांत्रिक स्तंभ परेडमध्ये सामील आहेत.


प्रजासत्ताक दिनाआधी भारताला श्रीलंकेकडून मोठी भेट, 56 भारतीय मच्छीमारांची सुटका


Sri Lanka to Release Indian Fishermen : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी भारताला श्रीलंकेने मोठी भेट दिली आहे. श्रीलंकेच्या न्यायालयाने मंगळवारी 56 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आदेश दिले. या मच्छिमारांना श्रीलंकेच्या समुद्रात मासेमारी केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. तामिळनाडूच्या नेत्यांनीही या मच्छिमारांच्या सुटकेची मागणी भारत सरकारकडे अनेकदा केली होती. श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता एकही भारतीय मच्छिमार त्यांच्या ताब्यात नसल्याचंही श्रीलंकेनं सांगितलं आहे.


भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, न्यायालयाने 56 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश दिल्याचे जाणून आनंद झाला. दुसरीकडे, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की, ''मी उच्चायुक्त गोपाल बागले आणि त्यांच्या टीमच्या सुटकेची खात्री करण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करतो.''


आता एकही मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात नाही
श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी तसेच भारतीय राजनैतिक सूत्रांनी सुटकेची पुष्टी केली आणि सांगितले की मंगळवारच्या आदेशानंतर श्रीलंकेत एकही भारतीय मच्छिमार कोठडीत नाही. मच्छिमारांना सोडण्याचा न्यायालयाचा आदेश अशा वेळी आला जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेला आर्थिक मदत चर्चेच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी आधारावर त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले.



भारताकडून श्रीलंकेला मोठे आर्थिक पॅकेज


भारताने या महिन्यात श्रीलंकेला त्याच्या वाईट परकीय चलनाच्या संकटाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले. 13 जानेवारी रोजी, भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेला 900 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली. काही दिवसांनंतर, 19 जानेवारी रोजी, भारताने पुन्हा 500 दशलक्ष डॉलरची मदत दिली. या मदतीने श्रीलंका आपल्या देशाच्या गरजेनुसार पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकेल.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.