एक्स्प्लोर

'कर्नाटकचा मुंबईशी संबंधच नाही' ; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत आहे. अशातच आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं आहे. याच वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही : उपमुख्यमंत्री

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की, कर्नाटक सीमेवरील ज्या गावांबाबत वाद आहेत, ते वाद मिटत नाहीत, तोपर्यंत ते केंद्रशासित करा. या मागणीचा आणि मुंबई केंद्रशासित करा या मागणीचा काही अर्था-अर्थी संबंध आहे का? कदाचित कर्नाटकमधील लोकांना बरं वाटावं म्हणून आमच्याही उपमुख्यमंत्र्यांनी जोरात काहीतरी मागणी केली आहे, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, त्याला काहीही अर्थ नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही. आपल्याला लागून असलेल्या मराठी भाषिक गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये अनेक वर्ष आमदार निवडून येत होते. तिथला महापौरही मराठी भाषिक असायचा. तिथल्या लोकांची मागणीही तशाच पद्धतीची होती. हे निवडणूकीद्वारे अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केली. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली. असं करुन तिथलं मराठी भाषिकांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला."

मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी म्हणाले की, 'कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे. या भागांतील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री म्हणाले होते की, "हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे." "हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केलं हा कोर्टाचा अपमान नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "एकतर हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कर्नाटक सरकार कायद्याचा विचार करत नाही. हा विषय तेवढ्यापुरते बोलायचं असतो. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे."

वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की "एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे.

"मराठी एकीकरण समिती तुटली कशी? मराठीदुहीचा शाप आहे. अनुभवाचे फटके पडले आता मराठी अस्मिता एकत्र आणत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. संघराज्याचं स्वप्न आहे. भाषावार प्रांतरचना झाली पण महाराष्ट्रातील मराठी माणसं आपल्यापासून दूर केली. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणार. मराठी आमदार निवडून आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.मराठी महापौर निवडून आले, पण त्यांनी काही केलं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह? आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका. जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया," असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Embed widget