एक्स्प्लोर

Maharashtra Weather : राज्यात थंडी वाढली, धुळ्यात पारा 8.4 अंशावर ; मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद 

राज्यात कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी चांगलीच वाढली (cold Weather) आहे. मुंबईत (Mumbai) यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Weather : राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी चांगलीच वाढली (cold Weather) आहे. मुंबईत (Mumbai) यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेलं आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी, पारा 8.4 वर 

धुळे जिल्ह्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं तिथे कडाक्याची थंडी पडली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे 10 अंशापर्यंत आलेलं तापमान आज 8.4 वर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.   वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. ही थंडी मात्र रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगली आहे. वाढती थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिक उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेत आहेत.

परभणीतही पारा घसरला

परभणी जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेल्या आठवड्यात गायब झालेल्या थंडीचे  पुनरागमन झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून परभणीत थंडीचा कडाका कायम आहे. सलग तीन दिवस परभणीचे  तापमान हे 10 अंशावर होते. तर आज हे तापमान 11 अंशावर गेलं आहे. त्यामुळं जिल्हाभरात चांगलीच थंडी पडत असून हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय. या थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक।उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.

मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद

दरम्यान, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाखाली गेलं आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातही तापमानात घट झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : पारा घसरला, गारठा वाढला; नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
Embed widget