एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. मात्र कोणत्याच प्रतिवादीला नोटीस नसल्याचा दावा करत उद्या सुनावणी करण्याची महाधिवक्त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी उद्या सकाळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पॉलिटीकल नाट्याचा दुसरा अंक उद्या पाहायला मिळणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं महाधिवक्ते तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं उद्या सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने महाधिवक्त्यांना राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेलं पत्र आणि फडणवीस यांनी त्यांच्याकडील बहुमताचा दावा करणारे पत्र उद्याच्या सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीने विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने मान्य केलेली नाही. या दोन कागदपत्रांचा अभ्यास करुन कोर्ट उद्या अंतिम निर्णय देणार आहे. तसेच कोर्टाने या प्रकरणात केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती एन.व्ही.रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी आणि शिवसेनेकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर मुकुल रोहतगी यांनी भाजप आमदार आणि अपक्षांकडून खिंड लढवली. कोर्टात नेमकं काय झालं? कर्नाटकच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातही तातडीनं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी केली. कपिल सिब्बल काय म्हणाले? (शिवसेना) जर त्यांच्याकडे (भाजप आणि अजित पवार) बहुमत असेल तर ते त्यांनी सिद्ध करावं. जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर आम्हाला सरकार स्थापन करण्याची अनुमती द्यावी. राज्यपाल हे एका पक्षाच्या आदेशाने काम करत असल्याचे कालच्या सगळ्या घडामोडींतून दिसून येत आहे. सगळे नियम, संकेत डावलून राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचं दिसून येत आहे. अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले? (राष्ट्रवादी) अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यावर आमचा आक्षेप आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नेता मानत नाहीत. त्यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. जर 41 आमदार त्यांना विधीमंडळाचा नेता मानत नसतील तर ते उपमुख्यमंत्रीपदी कसे राहू शकतात? जर तुम्ही उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले तर अनेक गंभीर गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर येतील. काल जे आमच्याकडे बहुमत आहे, असं म्हणतात ते आज बहुमत सिद्ध करताना एवढे दूर का पळतात? रोहतगींचा युक्तीवाद काय? (भाजप) राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांची सुप्रीम कोर्ट समीक्षा करु शकत नाही. गेल्या अनेक दिवसात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी बोटही हलवलं नाही. बहुमत सिद्ध करणे हे अपरिहार्य आहे. पण सुप्रीम कोर्ट कुठल्याही स्थितीत राज्यपालांनी दिलेल्या आदेशांची समीक्षा करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकरणातील पक्षकारांना नोटीस बजावा. त्यांची बाजू समजून घ्या आणि सगळ्यांनाच आपल्या हक्काचा रविवार शांतपणे घालवू द्या. खंडपीठ काय म्हणालं? भाजपने सरकार स्थापनेसाठी सादर केलेली सगळी पत्रं आणि कागदपत्रं कोर्टासमोर सादर करावीत. त्यानंतर कोर्ट या प्रकरणी उद्या योग्य तो निर्णय देईल. व्हिडीओ पाहा संबधित बातम्या अजित पवारांनी केलेलं बंड उधळून लावण्याच्या प्रयत्नांना वेग असा घडला पॉलिटिकल ड्रामा, पाहा संपूर्ण घटनाक्रम पवार कुटुंबातील राजकीय कलह | ठिणगी कुठे पडली? महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्या अध्याय सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
अभय भुतडा फाउंडेशनतर्फे 300 विद्यार्थ्यांना रु.21 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप
अभय भुतडा फाउंडेशनतर्फे 300 विद्यार्थ्यांना रु.21 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
Embed widget