एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. मात्र कोणत्याच प्रतिवादीला नोटीस नसल्याचा दावा करत उद्या सुनावणी करण्याची महाधिवक्त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी उद्या सकाळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पॉलिटीकल नाट्याचा दुसरा अंक उद्या पाहायला मिळणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं महाधिवक्ते तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं उद्या सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने महाधिवक्त्यांना राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेलं पत्र आणि फडणवीस यांनी त्यांच्याकडील बहुमताचा दावा करणारे पत्र उद्याच्या सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीने विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने मान्य केलेली नाही. या दोन कागदपत्रांचा अभ्यास करुन कोर्ट उद्या अंतिम निर्णय देणार आहे. तसेच कोर्टाने या प्रकरणात केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती एन.व्ही.रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी आणि शिवसेनेकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर मुकुल रोहतगी यांनी भाजप आमदार आणि अपक्षांकडून खिंड लढवली. कोर्टात नेमकं काय झालं? कर्नाटकच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातही तातडीनं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी केली. कपिल सिब्बल काय म्हणाले? (शिवसेना) जर त्यांच्याकडे (भाजप आणि अजित पवार) बहुमत असेल तर ते त्यांनी सिद्ध करावं. जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर आम्हाला सरकार स्थापन करण्याची अनुमती द्यावी. राज्यपाल हे एका पक्षाच्या आदेशाने काम करत असल्याचे कालच्या सगळ्या घडामोडींतून दिसून येत आहे. सगळे नियम, संकेत डावलून राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचं दिसून येत आहे. अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले? (राष्ट्रवादी) अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यावर आमचा आक्षेप आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नेता मानत नाहीत. त्यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. जर 41 आमदार त्यांना विधीमंडळाचा नेता मानत नसतील तर ते उपमुख्यमंत्रीपदी कसे राहू शकतात? जर तुम्ही उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले तर अनेक गंभीर गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर येतील. काल जे आमच्याकडे बहुमत आहे, असं म्हणतात ते आज बहुमत सिद्ध करताना एवढे दूर का पळतात? रोहतगींचा युक्तीवाद काय? (भाजप) राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांची सुप्रीम कोर्ट समीक्षा करु शकत नाही. गेल्या अनेक दिवसात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी बोटही हलवलं नाही. बहुमत सिद्ध करणे हे अपरिहार्य आहे. पण सुप्रीम कोर्ट कुठल्याही स्थितीत राज्यपालांनी दिलेल्या आदेशांची समीक्षा करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकरणातील पक्षकारांना नोटीस बजावा. त्यांची बाजू समजून घ्या आणि सगळ्यांनाच आपल्या हक्काचा रविवार शांतपणे घालवू द्या. खंडपीठ काय म्हणालं? भाजपने सरकार स्थापनेसाठी सादर केलेली सगळी पत्रं आणि कागदपत्रं कोर्टासमोर सादर करावीत. त्यानंतर कोर्ट या प्रकरणी उद्या योग्य तो निर्णय देईल. व्हिडीओ पाहा संबधित बातम्या अजित पवारांनी केलेलं बंड उधळून लावण्याच्या प्रयत्नांना वेग असा घडला पॉलिटिकल ड्रामा, पाहा संपूर्ण घटनाक्रम पवार कुटुंबातील राजकीय कलह | ठिणगी कुठे पडली? महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्या अध्याय सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget