एक्स्प्लोर

Maratha Reservation Bill: मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण? सगेसोयऱ्यांचं काय होणार? जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra assembly session: विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे. मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याची माहिती. मराठा आरक्षण विधेयकावर सभागृहात चर्चा होणार

मुंबई: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाईल. काही दिवसांपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला होता. विशेष अधिवेशनापूर्वी (Maharashtra assembly session) हा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचे विधेयक विशेष अधिवेशनात मांडले जाईल. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात केलेल्या शिफारसींबाबत थोडक्यात माहिती दिली होती. तेव्हापासून मराठा समाजाला नेमके किती टक्के आरक्षण मिळणार, याबाबत चर्चा सुरु झाली होती. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणबी नोंदी नसलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग तयार करुन आरक्षण दिले जाईल. कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही. त्यांनी पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू राहील. परंतु, कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांच्या सगेसोयऱ्यांनाही सरसकट आरक्षण लागू करण्याच्या तरतुदीचा मराठा आरक्षण विधेयकात समावेश असणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार?

मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे. त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याआधारे मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षणाची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचे समजते. परंतु, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार आहे. परिणामी हे आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकू शकेल, यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, हे पाहावे लागेल.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील प्रमुख मुद्दे

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजातील चालीरीती, रुढी, परंपरा आदी बाबींची नोंद करण्यात आली आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेशी संधी उपलब्ध नाहीत, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाजाचे असलेले प्रमाण याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक मराठा कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असून समाजातील बरासचा मोठा घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.


सगेसोयऱ्यांनाही कुणबी आरक्षण लागू होणार?

कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यासाठी अधिवेशनात मराठा आमदारांनी आवाज उठवावा, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. अन्यथा या आमदारांना मराठा विरोधी समजले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना आरक्षण लागू न केल्यास मराठा आंदोलकांची पुढची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा

विशेष अधिवेशनात सगेसोयरेंचा मुद्दा येण्याची शक्यता कमी

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget