Loksabha Election Results 2019 : अनेकांनी हातच्या जागा गमावल्या, नव्या जागा जिंकल्या
भाजपने सर्वाधिक 23 जागा, तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक राहिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जवळपास सर्वच निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक 23 जागा, तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक राहिली आहे. राष्ट्रवादीने पाच जागांवर तर काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही एक जागा जिंकली आहे.
या निवडणुकीत सर्व पक्षांनी काही विद्यमान जागा गमावल्या आणि नव्या जागी विजय प्राप्त मिळवला आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार खासदारांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर चार नवीन जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचाही विद्यमान दोन जागांवर पराभव झाला आहे, मात्र तीन नवीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.
शिवसेनेच्या हातून गेलेल्या जागा
शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील रायगड - अनंत गीते औरंगाबाद - चंद्रकांत खैरे अमरावती - आनंदराव अडसूळ
शिवसेनेनं नव्यानं जिंकलेल्या जागा
हिंगोली - हेमंत पाटील पालघर - राजेंद्र गावित हातकंणगले - धैर्यशील माने कोल्हापूर - संजय मंडलिक
कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि माढा येथे विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार होते. मात्र या दोन्ही जागा राष्ट्रवादीने गमावल्या आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक आणि माढ्यात संजय शिंदे पराभूत झाले आहे. तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रायगडमधून, अमोल कोल्हे शिरुरमधून आणि अमरावतीतून राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार नवनीत कौर राणा विजय झाल्या आहेत.
2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या नांदेड (अशोक चव्हाण) आणि हिंगोली दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. तर शिवसेनेतून काँग्रेसचे चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर वियजी झाले आहे.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या






















