एक्स्प्लोर

Kokan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पेटणार! समर्थक-विरोधक घेणार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी

Kokan Refinery : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी आता राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूचे नेते आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

Kokan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्या आता आणखी तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीच्या मुद्यावर आता दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र लिहिल्याचे समोर आल्यानंतर समर्थक आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. रिफायनरीविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणार आहेत. तर, रिफायनरी समर्थकांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. आपल्या दिल्ली भेटीत रिफायनरी समर्थक थेट केंद्रातील मंत्र्यांची भेट घेत रिफायनरीच्या सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार आहेत. 

कोकणात रिफायनरी हवी का नको? कोकणातील रिफायनरीला स्थानिकांच विरोध कि समर्थन? शिवसेनेची भूमिका काय? या साऱ्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र समोर आले. विरोधातील शिवसेना रिफानरीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं. पण, असं असलं तरी शिवसेनेनं मात्र स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका म्हणत पुन्हा एकदा सोयीस्कर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, 30 मार्च रोजी रिफायनरी विरोधकांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढत नवीन जागेवरील रिफायनरीला आपला विरोध असल्याचं देखील दाखवून दिलं. राजापूर शहरातील जवाहर चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेनं आमचा विश्वासघात करू नये अशी मागणी देखील करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं स्थानिकांना हवंय ते आम्ही करणार असल्याचं सांगतिले. 

प्रकल्पाला विरोध का? 

कोकणात चर्चेत असलेल्या रिफायनरीच्या प्रकल्पातून जवळपास 3 लाख कोटींची गुतंवणूक अपेक्षित असून किमान लाखभर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा खेळता राहणार असून देशाच्या आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, त्यानंतर देखील स्थानिकांनी या प्रकल्पाला मोठ्या संख्येनं विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार असून कोकणच्या सौंदर्यावर घाला येणार आहे. समुद्रात देखील प्रदूषण वाढणार असून या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पाला विरोध असून इतर कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा असल्याचं स्थानिकांनी मोर्चाच्या वेळी सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता केंद्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

6 एप्रिल महत्त्वाचा दिवस

मुख्य बाब म्हणजे बुधवार अर्थात 6 एप्रिलचा दिवस हा प्रकल्पाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. यावेळी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या गावचा ग्रामसभा आहे. त्यावेळी स्थानिकांचं मत रिफायनरी प्रकल्पााबत घेतलं जाणार आहे. जवळपास 5 हजार एकर जमिन या गावची आहे. मुख्य बाब म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाला कोणतीही कायदेशील मान्यता नसली तरी या गावच्या स्थानिकांचं मत काय आहे? याचा कल जाणून घेण्यास  मदत होणार आहे. गावचे नागरिक अर्थात ज्या व्यक्तिकडे मतदान कार्ड आहे अशा व्यक्तिला या रिफायनरीबाबतच्या ठरावावेळी मतदान करता येणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget