एक्स्प्लोर

पहलगाममध्ये फिरण्यास गेले, हल्ला होताच पाचावर धारण बसली, मराठवाड्यातील पर्यटक काश्मीरात सुखरूप

Jammu Kashmir: हा हल्ला झाला त्यावेळी जालना, नांदेड धाराशिव, परभणी, बीड तसेच भंडारा, जळगाव ,सांगली ,संगमनेर अशा बहुतांश जिल्ह्यांमधून पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत .

Jammu Kasmir Attack: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा समावेश आहे .यात डोंबिवलीतील 3 जण, पुण्यातील दोन व पनवेल मधील एका पर्यटकाचा मृत्यू झालाय .(Pahalgam Terror Attack)  मंगळवारी दुपारी (22 एप्रिल ) देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत गोळ्यांच्या फैरी झाडणार्‍या या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारत हादरलाय . मार्चमध्ये झालेल्या बर्फदृष्टीनंतर अनेक पर्यटक काश्मीरला येतात . यंदा पर्यटक वाढल्याने कश्मिरी नागरिक ही आनंदात असताना सर्वसामान्य पर्यटकांना टारगेट करत हा भ्याड हल्ला करण्यात आला . हा हल्ला झाला त्यावेळी जालना, नांदेड धाराशिव, परभणी, बीड तसेच भंडारा, जळगाव ,सांगली ,संगमनेर अशा बहुतांश जिल्ह्यांमधून पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत . महाराष्ट्रातील अनेक जण सुट्ट्या असल्याने काश्मीरला फिरायला गेले होते. (Marathwada Tourist)  हल्ला झाल्याचं कळताच फिरायला गेलेल्या पर्यटकांची पाचावर धारण बसली. अनेकांनी सुखरूप स्थळ गाठले. नातेवाईकांसह प्रशासनाला कळवत आपले थरारक अनुभव ही सांगितले आहेत.

पहलगाममध्ये सहकुटुंब फिरायला गेले तोच हल्ल्याची माहिती मिळाली..

पहलगाम इथं दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर काय घडलं हे धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितला आहे .हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाम या बिराजदार परिसरात होते .त्या ठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ते होते .त्यांनी सांगितलं,आम्ही तिकडे निघालो होतो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली. त्यावेळी सुरेश बिराजदार त्यांच्या कुटुंबीयांसोबत पहलगाम परिसरात पर्यटनासाठी गेले होते .घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात भारतीय सैन्य दलाने त्या परिसराला वेढा घातला होता .तात्काळ ॲम्बुलन्स परिसरात दाखल झाल्या .त्याचवेळी ड्रायव्हरने तात्काळ आम्हाला हॉटेलमध्ये आणलं .त्याचा धर्म वेगळा होता मात्र रात्रीतून तो सतत फोन करून आम्ही घाबरलो नाहीत ना हे विचारायचा .तुम्हाला हॉटेलमध्ये राहावं असं वाटत नसेल तर घरीही राहण्याची त्यांनी विचारणा केली या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केल्याची माहिती त्यांनी दिली आहे .

सुट्टीला आई वडील व मुलगा तिघेही पहलगामध्ये गेले, पण दैव बलवत्तर

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजूर येथील एका कुटुंबातील तीन जण पहलगांमध्ये अडकले आहेत  . आई वडील व मुलगा तिघेही सुट्ट्या निमित्त काश्मीरला फिरायला गेले होते .संदीप साबळे यांच्या पत्नी तेजस्वी साबळे आणि मुलगा कौस्तुभ साबळे (5) हे तिघेही सध्या पहलगाम येथील हिल पार्क हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे .पहलगाम मध्ये हल्ल्याच्या दिवशी ते हॉटेलमध्येच असल्याने सुखरूप बचावल्याची माहिती त्यांनी दिली .

तसेच जालना शहरातील संजय राऊत व इतर दोन जण बालाजी टूर तर्फे श्रीनगरला गेले होते .ते सध्या हॉटेल पाम पॅराडाईज येथे असून सुखरूप असल्याची माहिती आहे .

हल्ल्याच्या वेळी गुलमर्गला रवाना झाले ,नांदेडचे दोघेजण सुरक्षित 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झालेल्या ठिकाणी असणारे नांदेड मधील दोन पर्यटक कृष्णा लोलगे तसेच आणखी एक तरुण  हल्ला होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी तिथून गुलमर्ग येथे रवाना झाले . ते सुरक्षित आहेत असे व्हिडिओच्या मार्फत त्यांनी सांगितलं आहे .हल्ला झालेल्या ठिकाणी चार दहशतवादी हल्लेखोर होते असे कृष्णा लोलगे यांनी सांगितले आहे .

धाराशिव जिल्ह्यातील मंगळूरमधील सुभाष भानदास दुर्गडे व त्यांच्या तीन मुली एक मुलगा तसेच इतर कुटुंब कश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेली होती .हे संपूर्ण कुटुंब अमृतसर मध्ये सुरक्षित आहे .सुभाष दुर्गुळे,यशोदा दुर्गुळे त्यांची मुलगी शुभ्रा सुजाता ऐश्वर्या. तसेच मुलगा दिग्विजय व अरुण तुकाराम जाधव सुखरूप आहेत .

परभणीतील भास्कर डांगे आणि त्यांचे कुटुंबीय कश्मीरमध्ये सुखरूप

परभणीचे भास्कर डांगे हे सहकुटुंब कश्मीर फिरायला गेले होते .काल हल्ल्याच्या वेळी पहेलगाम मध्येच ते होते .तिथून बैसरण घाटी येथे जाणार होते मात्र बारीक पाऊस सुरू झाल्याने ट्यूलिप गार्डन बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्याने ठरलेला कार्यक्रम रद्द करून श्रीनगरला गेले .त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत . ते सध्या श्रीनगरला सुरक्षित आहेत .

हिंगोलीतील नवदाम्पत्य फिरण्यासाठी गेलं, दोघेही सुखरूप

हिंगोली शहरातील रहिवासी असलेले  शुभम अग्रवाल आणि रचना अग्रवाल यांचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोन जम्मू कश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते सध्या ते श्रीनगर येथे असून रात्री उशिरा ते श्रीनगर येथे पोहोचले आहेत सध्या ते एका हॉटेलमध्ये थांबले असून ते सुखरूप आहेत अशी माहिती शुभम चे वडील कैलास अग्रवाल यांनी दिली आहे पुढील फिरण्याचा संपूर्ण प्लॅन कॅन्सल करून परत येण्यासाठी घरच्यांनी त्यांना विनंती केल्याची सुद्धा माहिती आहे

हेही पहा:

महत्त्वाच्या बातम्या

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget