एक्स्प्लोर

'मटणवाले चाचा' IPS कृष्णप्रकाश...! वेशांतर करुन पोलिसांची घेतली भन्नाट 'परीक्षा'!

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'मटणवाले चाचा' बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली. यात काही पोलीस पास तर काही नापास देखील झाले. नापास झालेल्यांची आता मात्र खैर नाही.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्यांच्या खास आणि डॅशिंग शैलीसाठी ओळखले जातात. याची प्रचिती त्यांनी पुन्हा एकदा आणून दिली. सामान्य नागरिकांना पोलीस योग्य पद्धतीने सेवा देतायेत का? सामान्य नागरिकांचं यातून समाधान होतंय का? हे अनुभवण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर केलं. चक्क 'मटणवाले चाचा' बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली. यात काही पोलीस पास तर काही नापास देखील झाले. नापास झालेल्यांची आता मात्र खैर नाही. यासाठी मध्यरात्री चार तास त्यांनी पाहणी केली.

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात काही पिंपरी चिंचवडमधील पोलीस अंमलात आणताना दिसत नाहीत. तशा तक्रारींचा सूर अनेकदा सामान्य नागरिकांमधून उमटताना दिसून येतो. अगदी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे ही काही नागरिकांनी तो पाढा वाचला होता. म्हणून हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन अनुभवण्याचं पोलीस आयुक्तांनी ठरवलं. पण कसं? यासाठी वेशांतर करण्याचं त्यांनी ठरवलं. बुधवारी रात्री कोणाला खबर लागू न देता त्यांनी मुस्लिम व्यक्तीचा पेहराव केला. अगदी 'मटणवाले चाचा' दिसतील असे कपडे-गोल टोपी घातली आणि दाढी-केस लावले. कोणती शंका येऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना चाचीची भूमिका त्यांनी दिली. रात्री बाराच्या ठोक्याला खाजगी वाहनातून ते बाहेर पडले.

हिंजवडी आणि वाकड पोलीस पास

हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः तक्रारदार म्हणून पोलीस आयुक्त गेले. यात हिंजवडी आणि वाकड पोलीस पास झाले. इथं रात्रपाळीला उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी कृष्ण प्रकाश यांच्या गुगली प्रश्नांना योग्य उत्तरं दिली. सामान्य नागरिकांना जी सेवा आणि प्रतिसाद देणं गरजेचं आहे, त्या कसोटीवर इथले कर्मचारी उतरले. वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोहचण्याआधी एका ठिकाणी फटाके फोडले जात होते. तशी तक्रार स्वतः कृष्ण प्रकाश यांनाच आली होती. त्याचाच आधार घेत त्यांनी तक्रार केली. सोबत असणाऱ्या प्रेरणा कट्टे यांची ही तिथं छेड काढल्याचं ते म्हणाले. हे ऐकताच वाकड पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत तरुणांनी पळ काढला होता. मग ते कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी तक्रार करावी असं कर्मचारी म्हणाले. तेव्हा चाचा उच्चारले, आता मध्यरात्र झाली आणि मला रोजा पकडण्यासाठी घरी पोहचणे गरजेचे आहे. यावर कर्मचाऱ्यांनी घडला प्रकार गंभीर असल्याने तुम्हाला तक्रार द्यावीच लागेल, असा आग्रह धरला, ही बाब पोलीस खात्याच्या दृष्टीने योग्य होती. तेव्हा चाचांनी खरी ओळख सांगितली. इथं पोलीस पास झाले.

तिथून पिंपरी पोलिसांकडे मोर्चा वळला. दरम्यान दोन नाकेबंदीतून त्यांचं खाजगी वाहन गेलं. कडक लॉकडाऊनच्या नियमानुसार नाकेबंदीत चौकशी करणं अपेक्षित होतं. पण एका ठिकाणी पोलीस मोबाईलमध्ये दंग होते तर दुसऱ्या ठिकाणी पोलिसांचा आळशीपणा दिसून आला. मग ते पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. शेजाऱ्याला रुग्णवाहिकेची गरज आहे, मात्र ते अडवणूक करून अवाजवी पैशांची मागणी करतायेत, अशी तक्रार केली, यावर तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा व्यवहार योग्य नव्हता. एकतर तुम्ही पोलीस चौकीत जा अथवा शासकीय रुग्णवाहिका बोलवा असं कर्मचारी म्हणाले. पण शासकीय रुग्णवाहिकेचा हेल्पलाईन नंबर वारंवार व्यस्त येत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका बोलावणं गरजेचं आणि तुम्ही आमची मदत करा असं चाचा उच्चारले. पण तरी प्रतिसाद शून्य होता. इथं हे पोलीस नापास झाले. पहाटे चार वाजता मटणवाले चाचा पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पुन्हा आले. या चार तासात पास झालेल्या पोलिसांचं कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केलं, पण नापास झालेल्यांना आता मेमो दिला जाणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या वेशांतराचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. प्रत्येक शहरातील पोलीस प्रमुखांनी वेशांतर करून, आपल्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवायलाच हवी. तेंव्हाच "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने अंमलात आलं, असं म्हणता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget