एक्स्प्लोर

भाजपला राज्यात 2019 ला अंतर्गत गटबाजी नडणार?

राज्यात भाजपसाठी येत्या निवडणुकीत सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे, अंतर्गत वैमनस्य, हेवे -दावे आणि शिरजोरीचं राजकारण.

नागपूर : केंद्रात आंध्र प्रदेशातील टीडीपीने भाजपाला डच्चू दिला आहे, तर राज्यात शिवसेनाही सतत खो देण्याच्या पावित्र्यात असते. आगामी निवडणुकीला एकच वर्ष उरल्यामुळे राजकीय पक्षांचा निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. राज्यात भाजपसाठी येत्या निवडणुकीत सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे, अंतर्गत वैमनस्य, हेवे -दावे आणि शिरजोरीचं राजकारण. गेल्या 4 वर्षात मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोतात आणलेली, झटकन बलशाली झालेली एक युवा नेत्यांची पिढी याला कारणीभूत ठरली आहे. अशी पिढी, की जिने आपापल्या भागातील प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभं केलं. एकेकाळी ज्या पद्धतीची खुली चढाओढ आणि हेवे-दावे मोठ्या प्रमाणात फक्त काँग्रेसमध्ये दिसून यायचे, ते चित्र आता भाजपच्या पटलावर राज्यात बघायला मिळत आहे. थेट मुंबईपासून ते विदर्भापर्यंत अशी अनेक भाजप नेते आहेत, ज्यांच्यात टोकाचा वाद आहे. खरं तर राज्यातील भाजप सरकारची सुरुवातच मुळात नितीन गडकरी विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी झाली होती. आमदारांनी त्यावेळी फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होणार, असं समजताच, गडकरी यांच्या वाड्यावर रांग लावून, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलं होतं. तो वाद पुढे महाराष्ट्राच्या आणि खास विदर्भाच्या भल्यासाठी या दोन्हीही नेत्यांनी परिपक्वता दाखवत संपुष्टात आणला. पण इतर ठिकाणी मात्र भाजपातील सामने निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तस-तसे जास्तच रंगत आहेत. राज्यातील भाजपाचे काही महत्त्वाचे सामने
  • विनोद तावडे विरुद्ध आशिष शेलार (मुंबई)
  • संजय काकडे विरुद्ध गिरीश बापट (पुणे)
  • संजय धोत्रे विरुद्ध रणजित पाटील (अकोला)
  • एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन (जळगाव)
  • अनिल गोटे विरुद्ध जयकुमार रावल (धुळे)
खासदार संजय धोत्रे हे आपल्याच सरकारमधील मंत्री रणजित पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करतात, थेट मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टीमेटम देतात, तर अनिल गोटे हे आपल्याच पक्षाच्या जयकुमार रावलांकडे भ्रष्टाचाराचे बोट दाखवतात. उत्तर महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक एकनाथ खडसेंच्या कार्यक्रमात उपस्थित राहत नाहीत. तर खडसेंच्या समर्थकांना आपल्याच पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांना फारसे मोजावेसे वाटत नाही. पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. गिरीश बापट पुणे बघू शकतात, मला फक्त पुण्यापर्यंत मर्यादित राहायचं नाही, असं म्हणत खासदार संजय काकडे चिमटे काढतात. मुंबईत विनोद तावडे आणि आशिष शेलार आमने-सामने आहेत. मात्र थेट राजधानीच्या नेतृत्वाची, मुंबईतील भाजपाच्या चेहऱ्याची चढाओढ आहे. एकेकाळी एकत्र असणाऱ्या आणि गडकरींच्या जवळ असणाऱ्या या दोघांमध्ये विनोद तावडे हे स्वाभाविक मोठे नेते होते, मुंबईतील भाजपाचा चेहरा होते. पण सत्ता आली, तावडेंची बरीच जागा ही आशिष शेलार यांनी घेतली आणि आताही घेत आहेत. या सर्व अंतर्गत वादांचं विश्लेषण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हा अंतर्गत वाद प्रस्थापित विरुद्ध नवोदित नेते तर आहेच, तसाच हा आपले आणि बाहेरचे असाही आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जेव्हा लाभले, तेव्हा भाजपने हा विचारही केला नसेल, की युवा मुख्यमंत्र्यांची कंफर्ट-लेव्हल ही त्यांच्यासारख्याच तरुण, टेक्नोसॅव्ही नेत्यांबरोबर राहील. त्यामुळे एकनाथ खडसे असतानाही गिरीश महाजन, संजय धोत्रे असतानाही रणजित पाटील, संजय कुटे, अनिल गोटे असताना जयकुमार रावल, नाना पटोले असताना परिणय फुके यांचं महत्त्व वाढेल, असं त्यावेळी वाटलं नसेल. किंबहुना, प्रत्येक नेता हा पक्षाची ताकद वाढवताना पहिले आपली ताकत वाढवत असतो हा राजकारणाचा दुसरा नियम आहे. तेच देवेंद्र फडणवीस यांनीही केलं. त्यामुळेच संजय काकडे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नारायण राणे अशी ही मंडळी बाहेरुन पक्षाच्या जवळ आली. त्यांना तिकिटं, पदं मिळाली आणि ती अजून मोठी झाली. युती तुटली तर शिवसेनेचे उमेदवार हे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात खुल्या रिंगणात उतरतील. पण आतील गनिमीकाव्याचं काय? हा विचार भाजपला करण्याची वेळ राज्यात तरी आलेली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget