एक्स्प्लोर

Majha Katta : 'मी टॅक्सी ड्रायव्हर', नामदेव ढसाळांची आठवण सांगताना अर्जुन डांगळे झाले भावुक

Majha Katta: ज्येष्ठ विचारवंत कवी, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांनी 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

Majha Katta: ज्येष्ठ विचारवंत कवी, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांनी 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी दलित साहित्य, आंबेडकरी चळवळ आणि दलित पँथरचा जन्म कसा झाला? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात बोलताना दलित पँथर बद्दल त्यांनी सांगितले की, ''दलित पँथरने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला एक वळण दिलं आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा सत्याग्रह केला, तो रायगड येथे चवदार तळ्याचा. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हे सत्याग्रह केलं. अशा या महाराष्ट्रातच दलित पँथर वाढली, याचे कारण म्हणजे आम्हाला लहानपणापासून हे बाळकडू मिळालं आहे. महाराष्ट्रात 70 च्या दशकात दलितांवरील अन्याय वाढले होते. त्यावेळी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली होती. आम्हीही सर्व लिहते होतो. कोणी कविता लिहीत होता, तर कोणी लेख. अमेरिकेतील ब्लॅक पँथरची स्थापना करणारी मंडळी पाहिली तर तेही सर्व लेखक होते. त्यावेळी आम्हाला सर्वाना वाटले, नुसते कथा, कविता आणि लेख लिहून भागणार नाही. तेव्हा आम्ही देखील दलित साहित्यापासून दलित शब्द आणि पँथरपासून 'दलित पँथर' संघटना सुरू केली.''

'मी टॅक्सी ड्रायव्हर आहे', नामदेव ढसाळांचा सांगितला 'तो' किस्सा  

दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांची आठवण काढत अर्जुन डांगळे यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, प्रगत साहित्य सभा होती. त्यात सर्व डाव्या चळवळीतील लोक, आंबेडकरवादी, परिवर्तनवादी लोक आली होती. यात पु.ल.देशपांडे हे देखील आले होते. त्यावेळी 70 च्या दशकात भिवंडी येथे धार्मिक दंगल झाली होती. त्या निमित्ताने दंगलग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी ही सभा भरवण्यात आली होती. त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कविता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होत. अनंत काणेकर त्यावेळी अध्यक्ष होते. या संमेलनात विंदा करंदीकर, पाडगावकर असे सर्व दिग्गज कवी आले होते. त्यावेळी कार्यक्रम संपत असताना एक चिठ्ठी आली. त्यात लिहिलं होत की, 'मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, मला कविता वाचायची आहे.' त्यावेळी काणेकर म्हणाले वेळ संपत आली आहे. तेव्हा मी म्हटलं, वाचू द्या तो टॅक्स ड्रायव्हर आहे. मी म्हणालो तर माझ्यासोबत इतर विद्यार्थ्यांनीही आवाज उठवला. मग त्यांना कविता वाचून देण्यात आली.

ते पुढे म्हणाले, ''त्यानंतर डायव्हरच्या पांढऱ्या कळकट वेषातल्या, कुरळ्या केसाचा आणि सावळ्या रंगाचा कवी तिथे आला. त्याने तीन कविता वाचल्या, त्या तीन कविता म्हणजे मराठी साहित्याचे वळण बदलावणाऱ्या होत्या. त्याच नाव होत नामदेव ढसाळ. त्यावेळी तिथे राम पटवर्धन बसले होते. ते सत्यकथाचे कार्यकारी संपादक होते. त्यावेळी ते मला म्हणाले अर्जुनराव त्या मुलाला बोलवा. त्यांनी त्यांचं कार्ड दिलं आणि नंतर पुढील महिन्यात सत्यकथेत नामदेव यांच्या पाच कविता प्रसिद्ध झाल्या. सत्यकथेत कविता प्रसिद्ध होणे ही मनाची गोष्ट होती '' 

ढसाळांच्या आठवणी सांगताना झाले भावुक 

यावेळी नामदेव ढसाळ यांच्या आठवणी सांगताना अर्जुन डांगळे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, त्या साहित्य संमेलन ते शेवटी ढसाळ या जगाचा निरोप घेईपर्यंत आमची मैत्री राहिली. ते महान कवी होते. याचा मला अभिमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC Update : ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
Anil Parab: बिल्डरांनी ढापलेली जमीन सरकार कशी परत घेणार? नाशिक म्हाडा प्रकरणावरून अनिल परब विधान परिषदेत संतापले; उदय सामंत म्हणाले...
बिल्डरांनी ढापलेली जमीन सरकार कशी परत घेणार? नाशिक म्हाडा प्रकरणावरून अनिल परब विधान परिषदेत संतापले; उदय सामंत म्हणाले...

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
Nashik Food Poisoning : मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
Ketan Agarwal Death Case : केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget