एक्स्प्लोर

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ; गृह खात्याचे आदेश 

Jitendra Awad : औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं.

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचे गृह खात्याने (Home Ministry) आदेश दिले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या जीवाला मोठा धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे गृह खात्याने आदेश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना सध्या वाय प्लस सुरक्षा आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांची सुरक्षा वाढवण्याचे गृह खात्याने पोलिस दलाला आदेश दिले आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी गृहखात्याने परिपत्रक काढलं आहे.

औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचा व्हिडीओ ट्विट करत औरंगजेबाच्या प्रेमाखात आणखी कोणत्या थराला जाणार आहात असा प्रश्न विचारला आहे. महाजन यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलीय. त्यातच आता त्यांची सुरक्षा  वाढवण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत. 

येथून सुरू झाला वाद

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर ही पदवी देऊ नका ते धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रयतेसाठी निर्माण केलं त्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावर भाजपाकडून आणि शिंदे गटाकडून सातत्याने टीका होते आहे. शिवाय भाजपकडून त्यांच्या विरोधात आंदोलने देखील केली जात आहेत. याच वादावर बोलताना औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

"छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. 

महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : 'औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं', जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य 

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra Live blog updates:मोठी बातमी! आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ashok Kharat Nashik Court Hearing: जामीन मिळवण्यासाठी अशोक खरातच्या वकिलाचा आटापिटा, जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने भोंदूबाबाला 3 दिवसांची पोलीस कोठडी का सुनावली?
जामीन मिळवण्यासाठी अशोक खरातच्या वकिलाचा आटापिटा, जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने भोंदूबाबाला 3 दिवसांची पोलीस कोठडी का सुनावली?
Chandrashekhar Bawankule : खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले, समन्स देणे म्हणजे अंतिम..
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले, समन्स देणे म्हणजे अंतिम..
Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरात पोलिसांना धड उत्तरं देईना, महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
अशोक खरात पोलिसांना धड उत्तरं देईना, महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय-काय सांगितलं?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Ashok Kharat:अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी आयडेंटिटीने सेव्ह, सरकारी वकिलांचा कोर्टात
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Embed widget