एक्स्प्लोर

धरण उशाला, कोरड घशाला : पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. 

संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जिथे पिण्यासाठीच पाणी नाही, तिथं शेतातील फळबागा कशा जोपासायच्या ? असा प्रश्न पडलाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु या फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यातील आसोला येथील बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या विहिरीतील पाण्याच्या भरवशावर शेतामध्ये दोन एकर वर केळीची फळबाग लावली. परंतु आता विहिरीने तळ घातल्यामुळे हे फळबाग कशी जोपासायची असा प्रश्न ढोबळे यांना पडला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतामध्ये ही दोन एकरची फळबाग जोपासली आहे. परंतु पाणी कमी पडत असल्यामुळे आणि वाढतं तापमान यामुळे केळीची फळबाग होरपळून निघत आहे. परिणामी केळीचे पाने पिवळी पडत आहेत वाळून जात आहेत, तर अनेक पान फाटली आहेत.  या वाढत्या तापमानात ही केळीची फळबाग जोपासायची असेल तर कमीत कमी आठ तास केळीला पाणी देणे गरजेचे आहे. परंतु जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे केळीला पाणी कमी पडत आहे परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पपईच्या फळबागांची जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे पपईंच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणीच नाही. त्यामुळे पपईच्या फळबागा सुद्धा वाळून जात आहे का? झाडाला लागलेली फळे वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहेत. त्यामुळे ऐन पपई विक्रीच्या काळातच पाणीटंचाई आणि  तापमान वाढत आहे. त्यामुळे पपईच्या फळबागांना फटका बसतोय. 

परभणी जिल्ह्यात 17 टँकरने पाणी पुरवठा  

परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातलं दुसरे मोठे धरण येलदरी असताना जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ जिंतूर तालुका वासियांवर आली. कारण जिंतूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या 17 पैकी 11 टँकर जिंतूरमध्ये सुरू आहेत. 154 विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. धरणात पाणी असताना तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तर जिंतुरच्या ब्राम्हणगाव येथे विहिरी बोअर आटल्याने टँकर आणुन 80 फूट खोल विहिरीत टाकुन तिथून महिलांना लहान मुलांना पाणी भरावे लागत आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget