एक्स्प्लोर

Gaur Gopal Das : कसं कराल आयुष्य सुंदर? नवीन वर्षात सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र काय? गौर गोपाल दास म्हणाले...

Gaur Gopal Das : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपाल दास यांनी एबीपी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र सांगितला.

Majha Katta Gaur Gopal Das : 1 जानेवारीपासून आपल्या आयुष्यातील प्रत्येक पान कोरं आहे. त्यामुळं उद्यापासून आयुष्यातील पुस्तकात आपण चांगलं लिहू शकतो असे मत जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी व्यक्त केलं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपाल दास यांनी एबीपी माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते. आपलं आयुष्य हे पुस्तकासारखे आहे. आत्तापर्यंतची वर्ष ही पुस्तकातील धड्यासारखी गेली आहेत. जे गेलं त्याच्याकडे लक्ष देऊन उपयोग नसल्याचे ते म्हणाले. दररोज चांगल्या गोष्टी पाहा, त्यामुळं सकारात्मकता वाढेल असेही ते म्हणाले.

सकारात्मकता येण्यासाठी मेहनत करावी लागते

मनावर आपला ताबा असेल, तर आपल्याला साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आनंद मिळतो असेही गौर गोपाल दास यांनी सांगितसे. 2023 मध्ये कितीतरी अडचणी असल्या तरी तुमची संगत महत्वाची आहे. ज्यांच्या संगतीने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. मित्र असे हवेत ज्यांना आपल्या अडचणी सांगता याव्यात. ज्यांच्याकडे तुम्हाला मोकळेपणानं बोलता येईल असे गौर गोपाल दास म्हणाले. सकारात्मकता आपोआप येत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी निवड करावी लागते असे गौर गोपाल दास म्हणाले. आपल्याला मनाला ट्रेंड करावं लागेल. रोज चांगल्या दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहायच्या असेही ते म्हणाले.

 मन मोकळं करण्यासाठी मित्र हवेत

आपल्याला मनातल्या काही गोष्टी बऱ्याच वेळा बाजूला काढून ठेवाव्या लागतात. नाहीतर त्याचे ओझं होतं. आपण मनामध्ये खूप साऱ्या समस्या घेऊन भटकत असतो. कित्येक वेळेला मन खुलं करुन आपल्याला बोलताही येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या काही गोष्टी कोणालाच माहित नसतात. मात्र, आपण मन हलकं केलं पाहिजे असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. नकारात्मकतेकडून जर सकारात्मकता हवी असेल तर आपल्याला तीन चार चांगले मित्र हवेत. त्यांच्याकडे आपण मन मोकळ करुन बोलू शकेल. कारण आपल्या नात्यांमध्ये लोकं फरफेक्ट नसतात. त्यामुळं मित्र हवेत असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. आपण सतत चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, त्यामुळं आपल्यावर असणारं प्रेशर कमी होतो असंही त्यांनी सांगितले. 

आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तिथे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आई वडील असतील मित्र असतील किंवा जिथे काम करतो तिथे असणारे लोक असतील त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं गौर गोपाल दास यांनी सांगितले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget