एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं?

मुंबई: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली, तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे. पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 100 टक्के मागण्या मान्य न केल्यानं आज पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली. त्यातच किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.  जयाजी सूर्यवंशी यांना सरकारने 'मॅनेज' केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं? याबाबत एबीपी माझाने जयाजी सूर्यवंशी यांच्यांशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली. मी कुणाचाही गुलाम नाही जयाजी सूर्यवंशी म्हणाले, " माझे कोणाशीही लागेबांधे नाहीत,मी कुणाचाही गुलाम नाही, शेतकऱ्यांसाठी माझं काम आहे. आम्ही 4 महिन्यांसाठी संप स्थगित केलाय, जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर पुन्हा संप करु" नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम इतकंच नाही तर देशभरातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. त्यासाठीही किसान क्रांती देशभरात आंदोलन करेल, असंही त्यांनी नमूद केलं. याशिवाय कालच्या बैठकीत जे काही घडलं त्याबाबतचं मुख्यमंत्री कार्यालयाचं पत्र घेण्यासाठी मी सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर गेलो होतो, असं स्पष्टीकरणही सूर्यवंशी यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा "मुख्यमंत्र्यांनी आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या. राज्यातील बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, त्यांची कर्जमाफी करण्यास सरकार राजी झालं आहे. याशिवाय शेतमालाला हमीभाव, दुधाला दर देण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांबाबत वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा झाली, ही सर्व चर्चा सकारात्मक झाली", असं जयाजी सूर्यवंशी म्हणाले. मात्र असं असलं, तरी नाशिक आणि पुणतांब्यातील शेतकरी अजूनही संपावर ठाम आहेत, याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. पुणतांब्यात दोन गट त्याबाबत जयाजी सूर्यवंशी म्हणाले, "शेतकरी संपाबाबत 21 जणांची समिती आणि 6 जणांची कोअर कमिटी तयार करण्यात आली. या कोअर कमिटीत 2 जण नाशिकमधील आहेत. त्यांच्याही चर्चा झाली आहे. मात्र पुणतांब्यात स्थानिक राजकारण मध्ये येत आहे. स्थानिक राजकारणामुळेच दोन भाग पडले आहेत". मुख्यमंत्र्यांनी कानात काय सांगितलं? संप मिटल्यानंतर शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली. मात्र यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्याबाबत विचारलं असता, जयाजी सूर्यवंशी म्हणाले, "तुम्ही कसे आलात आणि कसे जाणार असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर मी त्यांना सांगितलं, आम्ही कशाने आलो नाही, जायचं पाहून घेऊ. इतकंच बोलणं झालं आणि ते कॅमेऱ्याने टिपलं." माझा आणि मुख्यमंत्र्याचा काहीही संबंध नाही, मी कधीही त्यांच्या कार्यलयात गेलो नाही. सदाभाऊ खोत आणि आमचे चळवळीतले संबंध आहेत. शरद जोशींच्या जळवळीत आम्ही काम केलंय. त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं होत असेल, तर त्यांचं सहकार्य निश्चित घेऊ, असं जयाजी सूर्यवंशी म्हणाले. संबंधित बातम्या महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं? नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार

व्हिडीओ

Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Embed widget