एक्स्प्लोर

'अजितदादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात'; राजू शेट्टींचा हल्लाबोल

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात असं शेट्टी म्हणाले.

Raju Shetti on CM Uddhav Thackeray : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर टोला लगावला. 'दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात' असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं. बारामती तालुक्यातील निंबुत गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी आयोजीत कार्यक्रमात शेट्टी बोलत होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टींनी दूध व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया दिली. दूध भेसळीबाबत कडक धोरण करण्याची गरज आहे. दुधाचा व्यवसाय अडचणीत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत दूध विकावं लागलं. त्यामुळं शेतकऱ्यांना गाई विकाव्या लागल्या. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. दुधाचे दर वाढले आहेत. लॉकडाऊन काळात दुधाचे दर कमी झाले होते. त्यामुळं गाई कमी झाल्या. त्यामुळं सरकारनं आता दूध खरेदीत सहभाग घ्यावा, अन्यथा आपलं राज्य दूध उत्पादनात मागे पडेल असे मतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.

अनेक विद्यार्थ्यांना फी वाचून अर्धवट शिक्षण सोडावं लागलं. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलं त्यांचा शोध घेऊन सरकारनं त्याचं शिक्षण पूर्ण करावं असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कामाबाबत मंथन केलं जाईल. शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केल हा प्रश्न आहे? उसाच्या एफआरपी चा मुद्दा असेल, भूसंपादनाचे कायदे असतील हे सरकारने निर्णय घेतले आहेत. त्यावर मंथन केलं जाईल आणि त्यांनंतर महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही ते ठवरल जाईल, असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितले.

मी 11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र दिले होते. त्याच उत्तर मला अद्याप मिळालेलं नाही असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोटे-मोठे पक्ष यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. वैचारिक बांधिलकीमुळं हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करु शकत नाहीत. या त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन महाविकास आघाडीतील मोठे पक्ष त्यांना गृहित धरत आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही. अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख करणारे पत्र  राजू शेट्टींनी शरद पवार यांना लिहले होते. मात्र, त्याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे शेट्टी म्हणाले.

दरम्यान, सागलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन देखील राजू शेट्टींना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी बोलण्यास नकार दिला. राष्ट्र पुरुषांच्या बाबतीत राजकारण करु नये. मला यामध्ये पडायचं नाही, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget