एक्स्प्लोर

राज्यपालांनी निर्णय घेतला तर एकनाथ खडसे आमदार होतील; राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या ते जळगावात आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांनी निर्णय घेतला तर एकनाथ खडसे आमदार होतील, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या आमदारकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांनी निर्णय घेतला तर एकनाथ खडसे आमदार होणार, असं सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या ते जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोतल होते.

"पाडळसरे धरण लवकर पूर्ण करावं असा प्रयत्न या सरकारचा असून त्यासाठी या धरणाच्या कामाचं नियोजन काय आहे. यासाठी धरणाला भेट दिली आहे. या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करणं, केंद्रीय मदतीची योजना त्यात बसवणं, हा आमचा प्रयत्न असणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाडळसे धरण आढावा बैठकीत बोलताना सांगितलं.

मराठवाड्याचे प्रश्न लगेच मार्गी लागतात मात्र खानदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. खानदेशात आपण कमी पडत आहात का? याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, "नुकताच या भागाचा दौरा केला असून जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागांतील प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. तसेच या भागांसाठी अधिक असा निधी उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून नियमित अर्थसंकल्पीय तरतूदींच्या पलिकडे जाऊन राज्यपालांच्या मर्यादेत अधिकचा निधी मिळवून प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करु."

राज्यपालांना आज विमान प्रवास करण्यास नकार देण्यात आला होता. या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "राज्यपालांना विमान प्रवास का नाकारण्यात आला याबाबत आपल्याला माहीत नाही आणि तसं करण्याचं काही कारणंही वाटत नाही, मात्र काही तांत्रिक कारणावरून असं झालं असू शकेल." अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले : जयंत पाटील

एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. "एकनाथ खडसे यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसेंचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की, काय अशी शंका उत्पन्न होतेय." असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, जयंत पाटील गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 2019 च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो, तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. महाविकास आघाडीची सत्ता येईल, मी जलसंपदा मंत्री होईल याची कल्पना देखील नव्हती, मात्र योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. एकनाथ खडसे यांच्या हस्ते या धरणाचं भूमीपूजन झालं आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचं उद्घाटन केलं जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जलसंपदा मंत्री जळगावचे असूनही पाडळसरे धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष; नाव न घेता खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget