एक्स्प्लोर

Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर विरोधी पक्षनेते यांना विचारले असता मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई : नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मान्य करावे आणि ग्राह्य धरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा विम्याचे क्लेम शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत. कर्जमाफी तर पोहचली नाहीच. पण, तगादा लावणाऱ्या नोटीस येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी SLBC ची बैठक बोलवून तात्काळ बँकांना कडक निर्देश दिले पाहिजेत. मागच्या काळात अतिवृष्टी, आवर्षण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत होते. मी आकड्यात बोलणार नाही. कारण मुख्यमंत्र्यानेच 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी मागणी केली होती. मदतीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार राज्याला देतंय : फडणवीस 

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.

Eknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget