एक्स्प्लोर

Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर विरोधी पक्षनेते यांना विचारले असता मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई : नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मान्य करावे आणि ग्राह्य धरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा विम्याचे क्लेम शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत. कर्जमाफी तर पोहचली नाहीच. पण, तगादा लावणाऱ्या नोटीस येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी SLBC ची बैठक बोलवून तात्काळ बँकांना कडक निर्देश दिले पाहिजेत. मागच्या काळात अतिवृष्टी, आवर्षण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत होते. मी आकड्यात बोलणार नाही. कारण मुख्यमंत्र्यानेच 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी मागणी केली होती. मदतीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार राज्याला देतंय : फडणवीस 

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.

Eknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Reel Star Rohini Paradhye Last Reel: मंगळवेढ्याच्या रिलस्टारनं आयुष्य संपवलं, रोहिणी पाराध्येच्या शेवटच्या इन्स्टा रिलमध्ये नेमकं काय?
मंगळवेढ्याच्या रिलस्टारनं आयुष्य संपवलं, रोहिणी पाराध्येच्या शेवटच्या इन्स्टा रिलमध्ये नेमकं काय?
Ahilyanagar Bribe News: आरोपीला मदत करण्यासाठी मागितली 1 लाखाची लाच; पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकावर कार्यमुक्तीच्या दिवशीच गुन्हा दाखल
आरोपीला मदत करण्यासाठी मागितली 1 लाखाची लाच; पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकावर कार्यमुक्तीच्या दिवशीच गुन्हा दाखल
NEET Exam Paper Leak: नीट परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट, दगाफटका टाळण्यासाठी परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नीट परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट, दगाफटका टाळण्यासाठी परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Instagram Influencer Death: आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं; जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
Embed widget