एक्स्प्लोर

Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर विरोधी पक्षनेते यांना विचारले असता मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई : नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मान्य करावे आणि ग्राह्य धरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा विम्याचे क्लेम शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत. कर्जमाफी तर पोहचली नाहीच. पण, तगादा लावणाऱ्या नोटीस येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी SLBC ची बैठक बोलवून तात्काळ बँकांना कडक निर्देश दिले पाहिजेत. मागच्या काळात अतिवृष्टी, आवर्षण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत होते. मी आकड्यात बोलणार नाही. कारण मुख्यमंत्र्यानेच 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी मागणी केली होती. मदतीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार राज्याला देतंय : फडणवीस 

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.

Eknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP Majha Impact : 'माझा'च्या बातमीचा दणका! मंत्रालयातील उसनवारी अधिकाऱ्यांचे पेकाट मोडले; सर्व प्रतिनियुक्त्या रद्द, मूळ विभागात परत धाडले
'माझा'च्या बातमीचा दणका! मंत्रालयातील उसनवारी अधिकाऱ्यांचे पेकाट मोडले; सर्व प्रतिनियुक्त्या रद्द, मूळ विभागात परत धाडले

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Onion Price Hike : केंद्र सरकार 5 शहरांमध्ये 35 रुपये किलोनं कांदा विकणार, नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 
केंद्र सरकार कांदा 35 रुपये किलोनं 5 शहरांमध्ये विकणार, नाशिकचा कांदा दिल्लीच्या बाजारात पोहोचणार
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Embed widget