एक्स्प्लोर

Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर विरोधी पक्षनेते यांना विचारले असता मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई : नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मान्य करावे आणि ग्राह्य धरण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा विम्याचे क्लेम शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत. कर्जमाफी तर पोहचली नाहीच. पण, तगादा लावणाऱ्या नोटीस येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी SLBC ची बैठक बोलवून तात्काळ बँकांना कडक निर्देश दिले पाहिजेत. मागच्या काळात अतिवृष्टी, आवर्षण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत होते. मी आकड्यात बोलणार नाही. कारण मुख्यमंत्र्यानेच 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी मागणी केली होती. मदतीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार राज्याला देतंय : फडणवीस 

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.

Eknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget