एक्स्प्लोर

Uniform Civil Code : लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, समान नागरी कायद्याची आवश्यकता: देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadanvis : देशात 'एक देश, एक समाज, एक कायदा' गरजेचा असून समान नागरी कायद्याच्या माध्यमातून ते शक्य असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

मुंबई: देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तसेच 'एक देश, एक समाज, एक कायदा' अशी संकल्पना असलेला समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करावा लागेल असं राज्याचे पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते लोकमत समूहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

अभिनेते नाना पाटेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये नाना पाटेकरांनी या दोघांना विविध प्रश्नावर बोलतं केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर हे वक्तव्य केलं. 

लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल

कुटुंब नियोजन कार्यक्रमावर आपण कधीच बोलणार नाही का? लोकसंख्या नियंत्रणात असेल तर आपल्याला फायदा होणार नाही का? यावर काय धोरण आहे असं नाना पाटेकर यांनी विचारलं. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल. त्यासाठी कायद्याची गरज आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी एखादा कायदा आणावा लागेल. चीनच्या धरतीवर आपण काही सक्ती करु शकत नाही. पण भारतातही भारतीय पद्धतीने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल."

समान नागरी कायद्याची गरज 

लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समान नागरी कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. ती प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. असा कायदा गोव्यामध्ये आहे, आता उत्तराखंडमध्ये येणार आहे. हळूहळू देशाच्या इतर भागातही तो कायदा लागू होईल. पण समान नागरी कायद्याच्या बाबतीत अफवा जास्त आहेत. त्यामुळे कुणाचे तरी आरक्षण जाईल, कुणावर तरी नियंत्रण येतील अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जात आहे. पण असं काहीही होणार नाही. 'एक देश, एक समाज, एक कायदा' अशा प्रकारचा हा समान नागरी कायदा आहे. त्यामुळे तो गरजेचा आहे. 

प्रत्येक सभेनंतर नाना पाटेकर यांचा फोन 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकरांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, पहिल्यांदा मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी माझ्या भाषणाच्या आवाजाचा स्तर उंच होता. त्यावेळी प्रत्येक भाषणानंतर मला नानांचा फोन यायचा. तुझ्या आवाजाचा स्तर जरा खाली आण, तो फार उंच होतोय असा सल्ला ते द्यायचे. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मला खूप फायदा झाला. आज जो माझ्यात काही बदल झालेला आहे तो सर्व काही नानांच्या सल्ल्यामुळे. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? शिंदेंसोबत काय बोलणं झालं, बच्चू कडूंनी सगळंच सागितलं
Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? शिंदेंसोबत काय बोलणं झालं, बच्चू कडूंनी सगळंच सागितलं
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Amol Mitkari: लढाईचं हेच फळ, हजार संधी ओवाळून टाकू, पण शांत बसणार नाही, जीवही देईन; अमोल मिटकरींची खळबळजनक पोस्ट
लढाईचं हेच फळ, हजार संधी ओवाळून टाकू, पण शांत बसणार नाही, जीवही देईन; अमोल मिटकरींची खळबळजनक पोस्ट

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
Embed widget