एक्स्प्लोर

Dapoli Khed Mandangad : बंडाळीनंतर दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय? 'कदमां'ना फायदा की नुकसान?

Dapoli Khed Mandangad Vidhan sabha constituency :  रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेला मतदारसंघ म्हणजे दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात काय स्थिती...

Dapoli Khed Mandangad Vidhan sabha constituency :  रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेला मतदारसंघ म्हणजे दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघ. इथं आमदार शिवसेनेचा पण खासदार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. कारण, या विधानसभा मतदारसंघातील काही भाग हा रायगड लोकसभा मतदारसंघात येतो. अर्थात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम या ठिकाणाहून आमदार आहेत. योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत रामदास कदम यांनी शिवसेनेतील एकंदरीत साऱ्या परिस्थितीवर टीकास्त्र डागलं. माझी शिवसेनेनं हकालपट्टी केली नाही तर मीच राजीनामा दिला अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असलेले अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील वादामुळे देखील या मतदारसंघातील घडामोडी अधिक चर्चिल्या गेल्या होत्या. अगदी दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीवेळी रामदास कदम आणि योगेश कदम यांना बाजूला सारत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना सक्रीय केलं गेलं होतं. यावेळी कदम यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या होत्या. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे देखील या मतदारसंघातील घडामोडी राज्याच्या राजकारणात चर्चिल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे या ठिकाणची गणितं कशी बदलणार? त्याठिकाणी राजकीय स्थिती सद्यस्थितीत कशी आहे? कुणाच्या बाजुनं आणि कुणाच्या विरोधात आहे? याबाबत देखील जाणून घेतलं. 

कोकणातील शिवसेनेची स्थिती काय, वाचा- Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडानंतर कोकणात शिवसेनेची काय स्थिती? फायदा नेमका कुणाला?

रामदास कदम यांचा संपर्क चांगला
याबाबत आम्ही दैनिक सकाळचे पत्रकार चंद्रशेखर जोशी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'सध्या तरी योगेश कदम यांना कुणी सक्षम विरोधक आहे असं म्हणता येणार नाही. योगेश कदम यांनी निधी देखील चांगला आणला आहे. गावच्या पायवाटेपासून ते नळपाणी योजनेपर्यंत त्यांनी कामं केली आहे. कदाचित इतक्या प्रमाणात आलेला निधी हा पहिलाच असावा. त्यामुळे विकासकामं देखील झालेली आहे. पण, शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे याबाबत कुठं वाच्यता झाली नाही. शिवाय रामदास कदम यांचा संपर्क देखील चांगला आहे. सध्याच्या स्थितीत रामदास कदम देखील या ठिकाणी लक्ष अधिकपणे देतील. त्यांचा संपर्क देखील चांगला आहे. कारण हा भाग दुर्गम असला तरी रामदास कदम यांनी हा सारा भाग पिंजून काढला आहे. त्यांच्या काळात देखील कामं झालेली आहेत. शिवाय, लोकं देखील जोडली गेली आहेत. त्यांचा एक भाऊ जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे. त्यांचा खेडमध्ये संपर्क आहे. या साऱ्याचा विचार करता सध्या तरी इथं कदमांना आव्हान देईल असा उमेदवार सद्यस्थितीत नाही. पण, महाविकास आघाडी, एखादा चांगला उमेदवार दिल्यास, शिवसेनेनं आतापासून लक्ष दिल्यास या ठिकाणी सध्या योगेश कदम यांना सोपं वाटणारं गणित बदलू शकते' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 

राजापूर मतदारसंघात काय हालचाली-  Rajapur Assembly Constituency : शिवसेनेतील बंडाळीनंतर राजापूरमध्ये पडझड नाही, पण..

खेडमध्ये मनसेचे वैभव खेडेकर यांची भूमिका महत्वाची
त्यानंतर आम्ही शैलेद्र केळकर यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी बोलताना केळकर यांनी देखील योगेश कदम यांना सद्यातरी पर्याय नाही. पण, शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल? हे देखील पाहायाला हवं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेत प्रवेश करू शकतात असं सांगितलं जात आहे. पण, कदमांचा प्रवेश केव्हा होणार? त्यानंतर त्यांच्याकडून किती प्रभावीपणे यंत्रणा राबवली जाते. पक्षाकडून त्यांना किती पाठबळ दिलं जातं? मुख्यबाब म्हणजे महाविकास आघाडी झाल्यास शिवसेना राष्ट्रवादीसाठी ही जागा सोडणार का? हे पाहावं लागेल. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी निधी देत मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न सत्तेत असताना केला होता. शिवाय, सध्या शिंदे गट आणि शिवसेना अशी चर्चा होत असताना योगेश कदम यांना या मतदारसंघात असलेली भाजपची साधारण 20 हजारांच्या घरात असलेली मतं मिळणार का? याचा देखील परिणाम या ठिकाणी होणार आहे. तर, खेडमध्ये मनसेचे वैभव खेडेकर यांची भूमिका देखील पाहावी लागेल. किमान शहरातील मतदारांवर ते प्रभाव पाडू शकतात. सध्या शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर रामदास कदम यांचे केबल व्यवसायिक बंधू सदानंद कदम यांच्या चालीकडे देखील पाहावं लागेल. कारण, अनिल परब आणि त्यांचे संबंध चांगले आहेत.यापूर्वी त्यांनी योगेश कदम यांना मदत केलेली आहे. पण, आता शिंदे विरूद्ध ठाकरे लढाईत त्यांची भूमिका काय असणार हे पाहावं लागणार आहे. अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

गुहागरमध्ये काय होणार, वाचा - Guhagar Assembly constituency : गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचं पारडं जड, पण...

शिवसेना एकला चलो चा नारा देणार?

योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आपली नाराजी बोलून दाखवली होती. शिवाय, शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं. यापूर्वी दापोलीतील अनिल परब आणि कदम यांच्यातील वाद हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना एकला चलो चा नारा देणार? का महाविकास आघाडी म्हणून लढणार हे निर्णायक असेल. शिवाय, महाविकास आघाडी झाल्यास त्या ठिकाणचा उमेदवार आणि मित्र पक्षांची साथ देखील या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. दापोली - खेड - मंडणगड हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. पण, योगेश कदम एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि सारी गणितं बदलली. त्यामुळे या ठिकाणची लढाई शिवसेनेसाठी सोपी नसणार आहे हे या ठिकाणच्या जाणकारांशी बोलल्यानंतर जाणवत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ratnagiri - Sangameshwar constituency : उदय सामंत यांचा रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ, जाणून घ्या काय आहे सद्यस्थिती?

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडानंतर कोकणात शिवसेनेची काय स्थिती? फायदा नेमका कुणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Embed widget