एक्स्प्लोर

नगरला वादळी वाऱ्याचा कहर, कोट्यवधी रुपयांचं नुकसान

वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हाहाःकार माजवला आहे. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये घर, शेती आणि जनावरं दगावल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

अहमदनगर : केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हाहाःकार माजवला आहे. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये घर, शेती आणि जनावरं दगावल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. श्रीगोंदा तालुक्यात आढळगाव, काष्टी, चांडगाव आणि गारसह पंधरा वाड्या-वस्त्यांना वादळाचा फटका बसला. तालुक्यात आतापर्यंत 346 घराचं पत्रे आणि भिंती पडून नुकसान झालं आहे. पत्रे उडाल्याने आणि घरं पडल्याने दहा जण जखमी झाले आहेत. तर दोन गाय, दोन शेळ्या आणि एक रेडकू दगावलं. या वादळात पोल्ट्रीचं शेड आणि पॉलीहाऊसही जमीनदोस्त झालं. साधारणपणे दहा घरांच्या नुकसानीचा आणि मृत जनावरांच्या आकडा सोळा लाखाचा आहे. अजून पंचनामे सुरु असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळाने दहा जण जखमी श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव, काष्टी, आढळगाव, चिखलठणवाडी, कणसेवाडीसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या वादळात चांडगावला तीन, ढोरजे गावात पाच आणि अजनुजला दोन पोल्ट्री कर्मचारी जखमी झाले. घरांचा पत्रा आणि दगडविटा अंगावर पडल्याने हात, पायाला आणि शरीराला जखम झाली आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. वादळात 346 घरांचं नुकसान काष्टीत 80 घरांचे पत्रे उडाले, तर गारला 40 घरांचे, सांगवीला 35, चांडगावला  60 आणि मुंढेकरवाडीला 20 घराचे पत्रे उडून भिंती पडल्या. त्याचबरोबर कणसेवाडीत 14, चिखलठणवाडी 16 आणि अजनुज 31, तर आनंदवाडीत 32 घरांचं पत्रे उडून नुकसान झालं. नगरला वादळी वाऱ्याचा कहर, कोट्यवधी रुपयांचं नुकसान फळबागा, पॉलीहाऊस आणि पोल्ट्रीला फटका वादळाने डाळिंब आणि लिंबाच्या फळबागा उन्मळून पडल्या. डाळिंबाने लगडलेली झाडं आणि लिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. तर कणसेवाडीत पॉलीहाऊचं आणि अजनुजला पोल्ट्रीचं नुकसान झालं. एकीकडे बाजारभाव नाही, त्यातच वादळाने हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नगरला वादळी वाऱ्याचा कहर, कोट्यवधी रुपयांचं नुकसान घरांचं नुकसान, संसार उघड्यावर घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अन्नधान्यात माती मिसळली असून जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागरिकांना अक्षरशः खाण्यासाठीही काही उरलेलं नाही. गॅसची शेगडी, भांड्यांवर दगडमाती पडल्याने आर्थिक फटका बसला आहे. नगरला वादळी वाऱ्याचा कहर, कोट्यवधी रुपयांचं नुकसान वीजपुरवठा खंडित चांडगावला दोन, तीन घरांवर विजेचे पोल आणि तारा पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालाय. अजून दोन ते तीन दिवस वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे याचा फटका पुन्हा शेतीला बसणार आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, तर काही ठिकाणी झाडं घरांवर पडल्याने नुकसानीत भर पडली आहे. शाळांचे पत्रे उडाले शाळांचे पत्रे उडाल्याने आता मुलांच्या शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात याच धोकादायक शाळांत मुलांना जीव मुठीत धरुन शिक्षणाची वेळ आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल विभागाने नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करुन निकषानुसार आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका

व्हिडीओ

Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
Pune Election: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
Embed widget