एक्स्प्लोर

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी जीवघेणे प्रयोग, अनेक ठिकाणी माणसांनी भरलेली वाहनं पकडली

कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांना गरज असेल तेंव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक आपल्या घरी पोहोचण्यासाठी प्रवास करण्यासाठी विविध क्लुप्त्या, आयडिया लढवत आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. संचारबंदीच्या काळात कुणीही अनावश्यक प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यात मजुरांचं प्रमाण जास्त आहे. आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर राज्यातून मुंबईत काम करण्यास आलेल्या कामगारांनी विविध मार्गांनी शहरं सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुलुंडमध्ये एका टेम्पोतून 64 जणांना उतरवलं काल रात्री मुलुंड येथील आनंद नगर टोल नाक्यावर एका टेम्पोमधून थेट उत्तर प्रदेश गाठण्याचा प्रयत्न 64 जणांनी केला होता. मात्र नवघर पोलिसांनी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे. हे सर्व कामगार असून मुंबईच्या मुंबादेवी परिसरात राहतात. तिथे हातगाडी चालवणे, तसेच इतर मिळेल ते काम करीत होते. मात्र आता हातालाच काम नसल्याने मुंबईत नक्की कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी अखेर टेम्पो चालक फारुख शेख यांच्या टेम्पोमधून उत्तर प्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कमीत कमी 3 दिवस चालणार होता. मात्र कमी जागेत कसेबसे कोंबून बसून या 64 जणांनी प्रवास सुरु केला खरा परंतु मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी टेम्पो चालक, मालक तसेच या लोकांना काम देणारे व्यक्ती अशा चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्वांना पुन्हा रात्री कुंभारवाडा येथे सोडण्यात आले.

अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

40 युवकांना ट्रकमध्ये कोंबून नेणाऱ्यावर कारवाई कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी काळात जिल्हा बंदी आणि राज्य सीमाबंदी असताना पोलीस चौकी पार करून पोलिसाची नजर चूकवून हैद्राबादवरून वाशीम मार्गे राजस्थानला जाणाऱ्या एका ट्रकला वाशीम शहर पोलिसांनी पकडले. आज सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. या ट्रकमध्ये एकूण 40 युवक होते. हे युवक रोजगारासाठी हैद्राबादला गेले होते. ते राजस्थानला निघाले होते. सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा नागपुरात कडक बंदोबस्त दुधाच्या टँकरमधून प्रवाशांची ने आन करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आता अशा दुधाच्या टँकरची देखील पोलिसांतर्फे पूर्ण तपासणी करण्यात येत आहे. नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या अशाच एका दुधाच्या टँकरची पोलिसांनी पूर्ण तपासणी केली. टँकरच्या झाकणाला सील लागल्याची व ड्रायव्हर जवळील कागदपत्रांची पूर्ण तपासणी करूनच हा टँकर पुढे सोडण्यात आला. पोलिसांकडून सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शेकडो ट्रक अडकले कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्याच्या तसेच जिल्हाअंतर्गत सीमा बंद केल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तळकोकणातील बांदा येथे सीमेवर शेकडो ट्रक अडकून पडले आहेत. या ट्रकचालकांना उपासमारीस सामोरं जावं लागत आहे. याची दखल घेत सामजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली. राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी, राज्य सरकारचा मोठा निर्णय पायी घरी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोने उडवलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचार बंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पेटलेल्या पैकी कल्पेश जोशी (32) तर दुसरा मयांक भट (34) अशी आहेत.
देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने गुजरात व राजस्थान येथील शेकडोच्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी निघाले आहेत. पण गुजरात शासनाने आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व नागरिक सीमा भागात अडकून पडले आहेत. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. मुंबई, पुणेसह पालघर जिल्ह्यातील व राज्यातील इतर भागात असलेल्या गुजरात व राजस्थानमधील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाणं पसंत केले आहे. रेल्वे तसंच इतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते. हे सर्व लोक महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाड जवळ पोहोचले असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्याने शेकडोंच्या संख्येने हे नागरिक खोळंबून पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget