एक्स्प्लोर

बाळासाहेब थोरात यांचे सरकारी कर्मचाऱ्यांना पत्र , म्हणाले....

हे पत्र तलाठी ते मुख्य सचिव आणि कस्तुरबा रूग्णालयातील उच्च पदावर असणारा कर्माचारी ते गावातील छोट्या कर्मचाऱ्याला पत्र देण्यात येणार आहे. महसूल मंत्र्याच्या सहीने हे पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे.

मुंबई : सरकारी काम सहा महिने थांब.. अशी टीका तर नेहमीच होते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पाच दिवस आठवडा करण्याचा निर्णय केला तेव्हा देखील विविध स्तरातून टीका झाली होती. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत टीकेचा सूर हा कायम असतो. पण कोरोना सारख्या संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण राज्य बंद करण्याची वेळ आली तेव्हा सरकारी रुग्णालय, जिल्हाधिकारी, तलाठी सर्वजण या संकटाच्या समयी काम करत आहे. संपूर्ण व्यवस्था नीट चालावी म्हणून हेच कर्मचारी झटत आहे. या कर्मचाऱ्यांना धन्यवाद करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक पत्र लिहिले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार त्यांनी या पत्राद्वारे मानले.

हे पत्र तलाठी ते मुख्य सचिव आणि कस्तुरबा रूग्णालयातील उच्च पदावर असणारा कर्माचारी ते गावातील छोट्या कर्मचाऱ्याला पत्र देण्यात येणार आहे. महसूल मंत्र्याच्या सहीने हे पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे.

नेमके काय लिहिले पत्र?

सप्रेम नमस्कार

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!

कोरोना विषाणूची धग महाराष्ट्रातही येऊन पोहोचली आहे, तुमची माझी चिंता वाढविणाऱ्या बातम्या सतत आपल्या कानावर येत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने पहिल्या दिवसापासून हे संकट गांभीर्याने घेतले. शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी, पोलिस बांधव, वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, फार्मासिस्ट, सपोर्ट स्टाफ आणि इतरही या लढाईत सामील असलेले असंख्य हात! आपण या लढाईतील खरेखुरे सैनिक आहात.

सण उत्सवांचा, कौटुंबिक सोहळ्याचा आणि आपल्या व्यक्तिगत सुटीचा विचार न करता महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आपण जोखीम पत्करून काम करत आहात. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धीराने सामोरे जातात, धोका पत्करून जनतेच्या पाठीशी उभे राहतात! ही शासन व्यवस्था तुमच्यामुळेच आहे. मला ठाऊक आहे आपलेही कुटुंब काळजीत आहे. सततच्या बातम्या त्यांच्याही जीवाला घोर लावतात, मात्र तरीही ही लढाई लढावीच लागणार आहे. आपल्याशिवाय हे युद्ध जिंकणे शक्य नाही.

इतरांच्या आरोग्याची काळजी करतांना आपण स्वतःलाही जपावे. मास्कचा वापर करावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा उपयोग करावा, बैठका-मदतकार्य करतांना 3 फूट अंतर ठेवावे, स्पर्श टाळावा आणि इतरही आवश्यक असलेली काळजी घ्यावी. महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबासोबतही संपर्क ठेवा! त्यांच्या चिंतेचे योग्य समाधान करा.

आरोग्य, पोलिस आणि महसूल विभागांसह इतरही सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गेली आठ दिवस कोरोना विरोधातील लढाईत व्यग्र आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि त्यांची टीम, विभागीय आयुक्त दररोज उशिरापर्यंत मैदानात आहेत. या अनपेक्षित लढाईला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व त्यांचे सर्व सहकारी हे अठरा अठरा तास व्यस्त आहेत. तलाठी समाजाला धीर देत आहेत, कोतवाल त्यांना मदत करत आहेत. तुम्ही घरदार सोडून राज्यासाठी दिवस रात्र एक करून काम करत आहात, त्याच कौतुक आहे.

केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, या काळात आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. पुढचे काही दिवस जनतेला शांत आणि महाराष्ट्राला गतिमान ठेवण्याची भूमिका आपल्याला निभावावी लागणार आहे, आपण ती यशस्वी कराल याबद्दल मला खात्री आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, आज गुढीपाडव्याच्या दिवशीही आपण बाहेर आहात, तुमच्या या त्यागाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

पुन्हा एकदा विनंती करतो, आपण आपलीही काळजी घ्या!

धन्यवाद!

बाळासाहेब थोरात

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sangli Municipal Corporation: पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
Accident: धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'

व्हिडीओ

Vinayak Pandey PC : ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात,म्हणाले माझी नाराजी नाही...
Sanjay Raut PC : ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, भाजपनं, फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?
Varsha Gaikwad On Coffee With Kaushik : मुंबई मविआत मिठाचा खडा का पडला? वर्षा गायकवाड Exclusive
Mahayuti Seat Sharing : सुटला जागांचा वांदा, पण दोन दिवस थांबा Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sangli Municipal Corporation: पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
Accident: धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
कोल्हापुरात इकडं काँग्रेस ठाकरे सेनेचं ठरलं, तिकडं 'जनसुराज्य'ची सुद्धा एन्ट्री; 70 इच्छुकांच्या मुलाखती घेताच आमदार विनय कोरे काय म्हणाले?
कोल्हापुरात इकडं काँग्रेस ठाकरे सेनेचं ठरलं, तिकडं 'जनसुराज्य'ची सुद्धा एन्ट्री; 70 इच्छुकांच्या मुलाखती घेताच आमदार विनय कोरे काय म्हणाले?
Nashik Election BJP: इकडे देवयानी फरांदेंनी भाजप प्रवेशाची वाट रोखली, तिकडे संजय राऊतांनी हकालपट्टी केली, यतीन वाघ, विनायक पांडे मध्येच लटकले
इकडे देवयानी फरांदेंनी भाजप प्रवेशाची वाट रोखली, तिकडे संजय राऊतांनी हकालपट्टी केली, यतीन वाघ, विनायक पांडे मध्येच लटकले
Sandeep Despande: राज-उद्धव युतीनंतर संदीप देशपांडेंचा पहिला वार, 'बटोगे तो पिटोगे' घोषणेला काऊंटर चॅलेंज, म्हणाले...
राज-उद्धव युतीनंतर संदीप देशपांडेंचा पहिला वार, 'बटोगे तो पिटोगे' घोषणेला काऊंटर चॅलेंज, म्हणाले...
Rohit Sharma News : तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
Embed widget