एक्स्प्लोर

भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील पक्षांची चढाओढ : चंद्रकांत पाटील

पहिल्यांदा कोण बाहेर पडणार आणि भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार यासाठी राज्य सरकारमध्ये चढाओढ चालली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

Chandrakant Patil : राज्याच्या राजकारणातून पहिल्यांदा कोणी बाहेर पडायचे आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करायचे यासाठी पक्षांची चढाओढ लागली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही इतके मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा ही आपल्या सांगण्याइतका मोठा नेता मी नसल्याचे पाटील म्हणाले.

पहिल्यांदा कोण बाहेर पडणार आणि भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार यासाठी राज्य सरकारमध्ये चढाओढ चालली आहे. तुम्ही कोणासोबत जाणार असा प्रश्न पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, मला माहित नाही. कारण आमच्या पक्षात मी एकट्याने सांगण्याइतकी हुकूमशाही नाही, आमच्या पक्षात लोकशाही असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या 26 महिन्यात शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा इतिहास आहे. भाजपच्या आमदारांना निधी द्यायचा नाही. सामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हा महाविकास आघाडीचा इतिहास आहे. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचे नेमकं चाललंय काय? आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई इतकंच काम राज्यात उरलंय? केंद्रीय मंत्री असले तरी कायद्यानुसार राणेसाहेबांना नोटिस देता येत असली, तरी 65 वर्षांवरील व्यक्तीसाठी वेगळी तरतूद आहे, याचा सोयिस्कर विसर? पडला असल्याचे पाटील म्हणाले.
मुळात राज्य सरकारला कायद्याची इतकी बूज असती तर विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी कायदा धाब्यावर कशाला बसवला असता? सोयीचं तेच आपलं, अशा धोरणानं कारभार चाललाय. अशा नोटिशी देऊन राणेसाहेबांना महाराष्ट्रात येणं भाग पाडलं की, तुम्ही जिंकलात? किती बालिश, किती हास्यास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेला कसं बनवलं, हे स्वतःच सांगितलंय. 'माझ्या एका वाक्याने भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला,' असं ते म्हणालेत. खरं तर त्यांनी मी शिवसेनेला भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसायला कसं भाग पाडलं, असं म्हणणं अधिक संयुक्तिक झालं असतं. तरीही जर शिवसेनेला त्यांच्यासोबत प्रेम असल्याचे पाटील म्हणाले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाकेZero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणाZero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुराHasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
Supreme Court on Madrasas : मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
Embed widget