एक्स्प्लोर

Lockdown | हळूहळू सगळं सुरु करतोय मात्र शिस्त पाळणं गरजेचं : मुख्यमंंत्री ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल असं म्हटलंय. राज्याच्या लॉकडाऊनबाबत देखील त्यांनी महत्वाचं भाष्य केलं.

मुंबई : पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज फेसबुक लाईव्ह संवादात बोलत होते. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. 31 तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. ठाकरे म्हणाले की,  एकदम लॉकडाऊन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ते म्हणाले की, दुकानं उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  पुढच्या 15 दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल, असं ठाकरे म्हणाले. CM Uddhav Thackeray | कोरोनाचा गुणाकार जीवघेणा होणार, पण राज्य सरकार सज्ज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातलं अर्थचक्र कसं चालणार यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच 75 ते 80 टक्के कापूस खरेदीचाही विचार आहे असंही त्यांनी सांगितलं. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही. राज्यावरचं संकट टाळलं जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा, असं मुख्यमंत्री म्हणाले. मदत केल्याची जाहिरात करायची का? पॅकेजची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही, असं ते म्हणाले. कोरोनाबाधित गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी गेल्या आहेत. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक मतमोजणी केंद्रात गदारोळ; विद्यमान आमदार उपस्थितीवर गोकुळ गिते यांनी घेतला आक्षेप
Maharashtra Live blog updates: नाशिक मतमोजणी केंद्रात गदारोळ; विद्यमान आमदार उपस्थितीवर गोकुळ गिते यांनी घेतला आक्षेप
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!
उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!
Shivsena Opration Tiger: शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी; आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार, सगळ्यात मोठी घडामोड घडणार!
शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी; आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार, सगळ्यात मोठी घडामोड घडणार!
Maharashtra Rain Updates: मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 2 दिवस यलो अलर्ट; राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार
मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 2 दिवस यलो अलर्ट; राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 2 दिवस यलो अलर्ट; राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार
मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 2 दिवस यलो अलर्ट; राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार
BEST employees strike finally called off: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Uddhav Thackeray: 'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
Mumbai Monsoon Rain: मुंबईत ढगांचा गडगडाट, काळ्या ढगांची गर्दी, आनंदसरी बरसण्यास सुरुवात; मान्सून मुंबईत आला का?
मुंबईत ढगांचा गडगडाट, काळ्या ढगांची गर्दी, आनंदसरी बरसण्यास सुरुवात; मान्सून मुंबईत आला का?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
Embed widget