एक्स्प्लोर

मुख्यमंत्री मराठवाड्यातील दुष्काळाचा औरंगाबादेत आढावा घेणार

औरंगाबादेत बुधवारी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. विभागीय आयुक्त आणि आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला हजर राहतील. गृहमंत्री म्हणून यावेळी ते गुन्ह्यांबाबतचाही आढावा बैठकीत घेण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत आढावा बैठक घेणार आहेत. मराठवाड्यात या वर्षी सरासरीच्या 62 टक्के पाऊस पडलाय. त्यात खरीपाचा हंगाम पूर्णतः वाया गेलाय. पाणीसाठ्याचीही भीषण अवस्था आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील तीन हजार गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. काय आहे मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती? सरकारी आकडेवारीनुसार, मराठवाड्यात तीन हजार गावांवर दुष्काळाचं सावट आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. खरीप हंगामाची पैसैवारी जाहीर झाली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नजर अंदाजाने काढलेल्या आणेवारीत मराठवाड्यातील 8 हजार 533 गावांपैकी तब्बल 2 हजार 958 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. म्हणजे ही सगळी गावं दुष्काळाच्या भीषण सावटाखाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. कशी आहे मराठवाड्यातील आणेवारी? औरंगाबाद जिल्ह्यातील 1355 गावांपैकी 1335 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. जालन्यातील 971 गावांपैकी 952 गावांची पैसैवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. बीडमधील एकूण 1402 गावांपैकी 671 गावांती पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. यामुळे मराठवाड्यातील पैसैवारीचा हा अहवाल मदत व पुनर्वसन खात्याला मराठवाडा विभागीय आयुक्तांकडून पाठवण्यात आलाय. मराठवाड्यातील पिकांची परिस्थिती पावसाअभावी नगदी पीक मूग आणि उडीद हातातून गेलं आहे. सोयाबिन, कापूसही हातचा गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद, बीड आणि जालनामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 53.29 टक्के, जालन्यात 61 टक्के तर बीडमध्ये  50 टक्के इतका पाऊस झाला आहे. संपूर्ण मराठवाड्यातच वार्षिक सरासरीच्या फक्त 64 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील पेरणी मराठवाड्यात एकूण 50 लाख चार हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी 48.61 लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला होता. सध्या मूग आणि उडीद पिकांची काढणी सुरु आहे. त्यात 10 ते 50 टक्के घट येत आहे. मकाच्या उत्पादनातही 40 टक्के घट अपेक्षित आहे. सोयाबिनसुद्धा 35 ते 50 टक्क्यांपर्यंत घटणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Embed widget