एक्स्प्लोर

कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार : मुख्यमंत्री

मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं. आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी विधानभवनात आमच्या सरकारने आरक्षणाचा कायदा केला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

मुंबई : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आमचंच सरकार देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं. आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी विधानभवनात आमच्या सरकारने आरक्षणाचा कायदा केला, मात्र हायकोर्टाने स्थगिती दिली. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. 1992 सालच्या जजमेंटनुसार 50 टक्क्यांच्या वर आरक्षण न्यायचं असेल, तर मागासलेपणाचे निकष सिद्ध होत नाहीत, मागासवर्ग आयोग तसा अहवाल देत नाही, तोपर्यंत आरक्षण टिकू शकत नाही. त्यामुळेच मागासवर्ग आयोगाला आम्ही लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असल्याचंही फडणवीस म्हणाले. आयोगाचे नवीन अध्यक्ष वेगाने काम करत असून निवेदनं स्वीकारत आहेत. मराठा समाजाला आरक्षण आमचंच सरकार देईल, असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. केवळ भावनेत वाहून गेलो तर आक्रोश तयार होईल पण कायदेशीर बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. जाळपोळ आणि तरुणांनी केलेल्या आत्महत्यांच्या घटना व्यथित करणाऱ्या असल्याच्या भावनाही फडणवीसांनी व्यक्त केल्या. एससी, एसटी, ओबीसी यांना धक्का न लावता आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. अध्यादेश काढण्याची मागणी होते, मात्र ते आरक्षण टिकणार नाही. ज्यांना हे समजतं, ते आज बोलू शकत नाहीत, कारण ते दडपणात आहेत. पण ज्यांना हे समजत नाही, त्यांना निश्चित भविष्यात आमचा प्रयत्न प्रामाणिक असल्याचं समजेल असंही फडणवीस म्हणाले. मुंबईत अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणारं शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल. स्मारकासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळवण्यात आम्हाला यश आलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपतींची उंची इतकी मोठी आहे की पुतळ्याच्या उंचीने ती मोजली जाऊ शकत नाही. मात्र महाराजांच्या स्मारकाच्या उंचीबाबत केलेलं राजकारण दुर्दैवी असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. राजाराम महाराजांविषयी गौरवोद्गार - विसाव्या शतकाचा सुरुवातीला आधुनिक भारताची मुहूर्तमेढ कोल्हापूर संस्थानात करण्यात आली - महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम छत्रपती राजाराम महाराजांनी केलं - प्रजेचं सुख हेच माझं अंतिम ध्येय आहे, त्यासाठी वाट्टेल तो त्याग करेन असे राजाराम महाराजांचे विचार होते - सिंचनाच्या शाश्वत योजना, तलाव आणि जलाशयाच्या निर्मितीचं त्यांनी सुरु केलेलं काम आज जर झालं असतं तर आज राज्यात शेतकऱ्यांची ही परिस्थिती नसती -राजाराम महाराजांनी प्रत्येक गावात शाळा असावी, असा आग्रही विचार केला, शिक्षणासाठी दुपटीने तरतूद केली - छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराजांच्या सिंचनविषयक धोरणांमुळे कोल्हापूर शेतीत समृद्ध - राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी कोल्हापुरात विमानतळाची निर्मितीचा राजाराम महाराजांनी केली - सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ, शाश्वत शेतीचा विचार, औद्योगिकीकरणाची सुरुवात राजाराम महाराजांनी विसाव्या शतकात केली पाहा व्हिडिओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा, विमान दुर्घटनेत अशोक खरात कनेक्शन?
अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा, विमान दुर्घटनेत अशोक खरात कनेक्शन?
मराठी शाळा बंदच्या मुद्यावरुन AISF चे कार्यकर्ते आक्रमक, मंत्री  पंकज भोयरांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांकडून बळाचा वापर
मराठी शाळा बंदच्या मुद्यावरुन AISF चे कार्यकर्ते आक्रमक, मंत्री  पंकज भोयरांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांकडून बळाचा वापर

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priya Shinde : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदेंची मदत झाली का? प्रिया शिंदे म्हणाल्या...
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदेंची मदत झाली का? प्रिया शिंदे म्हणाल्या...
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
नेत्यानाहू गाझापटी साफ करून इराणमध्ये तेच करू लागले, पण इराणच्या पलटवारात इस्त्रायलमध्ये आक्रोश, 300 जखमी; पंतप्रधान म्हणाले, 'अतिशय कठिण संध्याकाळ..'
नेत्यानाहू गाझापटी साफ करून इराणमध्ये तेच करू लागले, पण इराणच्या पलटवारात इस्त्रायलमध्ये आक्रोश, 300 जखमी; पंतप्रधान म्हणाले, 'अतिशय कठिण संध्याकाळ..'
IPl 2026: केकेआरला IPL सुरु होण्यापूर्वीच दुसरा तगडा झटका; सलग दुसरा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; 18 कोटी मोजलेला सुद्धा गोलंदाज सुद्धा धर्मसंकटात!
केकेआरला IPL सुरु होण्यापूर्वीच दुसरा तगडा झटका; सलग दुसरा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; 18 कोटी मोजलेला सुद्धा गोलंदाज सुद्धा धर्मसंकटात!
अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा, विमान दुर्घटनेत अशोक खरात कनेक्शन?
अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा, विमान दुर्घटनेत अशोक खरात कनेक्शन?
ATM Card Rules : एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या नवी अपडेट
विविध बँकांचे 1 एप्रिलपासून एटीएम कार्ड वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
Embed widget