एक्स्प्लोर

अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत, कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचा दावा

कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे आहे. हे एक षडयंत्र आहे या मागे कोण आहे हे शोधून काढले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. 

अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले आहे. गावपातळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. ,निवडणुकीतल्या यशामुळे जनताही पाठिशी    असल्याचंही वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे. सगळेच एका बाजुला आले तर काय करायचं? विरोध कशासाठी?'  असा सवाल देखील भुजबळांनी केला आहे. 

भुजबळ म्हणाले,  आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी त्यांच्यासोबत गेलो, स्वार्थासाठी नाही. शेतकऱ्यांचे, शहरातले, गावांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यासोबत जावंच लागणार आहे. महाराष्ट्रातील जनता, पक्षाचे तमाम कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलं की, भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादीच आहे. जनतेनं या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं की आमचा निर्णय बरोबर आहे. 

नाशिकमध्ये (Nashik Unseasonal Rain) प्रचंड पावसामुळे झालेल्या नुकसानमुळे शेतकऱ्यांना सांत्वन द्यायला गेलो. शेतकरी रडत होते. द्राक्षाच्या बागा विकल्या गेल्या. मात्र हार्वेस्टिंगच्या वेळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. एका शेतकऱ्याचं पन्नास लाखांचं नुकसान झाले, त्यांचे अश्रू पुसायला कुणीतरी जायला हवं होतं . तिथे आंदोलनं केली चले जाव म्हटलं. मी म्हणालो राजकारण बाजूला ठेवा. तर त्यांचं म्हणणं होतं की गावबंदी आहे, इतर वेळी राजकारण ठीक आहे. हे कोण करतंय हे आम्हाला माहिती आहे..काही ठराविक लोकांना प्रवेश असतो, ठराविक पक्षाच्या लोकांना प्रवेश असतो. संकटाच्या वेळी आपण जनतेचे अश्रू पुसणं आपलं कर्तव्य आहे, असे भुजबळ म्हणाले. 

आमचे काय चुकले? 

 भुजबळ म्हणाले, आमचा पक्ष जुना आहे, 1999 मधे स्थापन झाला आहे. या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ इथेच आहे. आता सगळेच्या सगळे आमच्यासोबत आले तर आमची काय चूक आहे.  तुमचंही हेच चाललं होतं. काल प्रफुल  पटेल म्हणाले, त्यातल्या काही गोष्टी प्रफुलभाईंना माहिती आहे,अजितदादांना माहिती आहे. मला थोड्या माहिती आहे. तळ्यात मळ्यात असं करू नका, काय ते एकदा ठरवा... हे मी म्हणालो होतो. बरं, हे काही एकदा झालं नाही अनेकदा प्रयत्न झाला. पाच वेळा तेच ते काय चुकलं आमचे? असा सवाल छगन भुजबळांनी केला आहे.  

छगन भुजबळ म्हणाले,  आम्ही पूर्वीपासूनच शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. मार्ग बदलला, मार्ग बदलला असा आरोप होतो. नितिशकुमार, जयललिता, नवीन पटनायक, महबूबा मुफ्ती हे सगळे भाजपसोबत गेले होते. त्यांची विचारसरणी बदलली का? आम्ही त्यांच्यासोबत गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? शिवसेना आणि भाजप हे एकत्रच होते. आता आम्ही त्यांच्यासोबत गेलो तुमच्या मनात 5-7 वेळा आलं होतं त्यांच्यासोबत जाण्याचं मात्र मन सारखं बदलत होतं.

अजित पवार मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार 

शेतकऱ्यांच्या अवकाळी, दुष्काळ,शेतमालाचे भाव या सगळ्या अडचणी सोडवायचे आहेत. विकासाची कामं, रखडलेली कामं, अडचणीचे प्रश्न सोडवले जाता आहेत.  राष्ट्रवादी कुणाची याची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याचाही निर्णय येईलच लवकर लोक जेव्हा दु:खात असतात, अडचणीत असतात तेव्हा लोकांसाठी काम करणं हे आपलं काम आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं म्हटलं तर ते म्हणतात अजितदादा मुख्यमंत्री होणारच नाही..तर ते शुभेच्छाही देत नाही.उलटंच सगळं करतात,,एवढा दुरावा का? आपण राजकारणातले विरोधक आहोत, शत्रू नाही..शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे. आपल्यासोबत जनतेच्या शुभेच्छा आहेत.जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील जेणेकरून आपलं हे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला आहे. 

कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे

 मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे फक्त दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे..शरद पवारही हेच बोलतात पण प्रत्येक जण आपापला वेगळा अर्थ काढतो आणि विरोध करतो. प्रकाश सोळंकेंच्या घराची अवस्था पाहिली असती तर डोळ्यात पाणी आलं असतं. कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे आहे. हे एक षडयंत्र आहे या मागे कोण आहे हे शोधून काढले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. 

राज्यात अशांतता असेल त्या राज्यात उद्योगधंदे येणार कसे?

राज्यात शांततेचे वातावरण आहे. अशांतता का निर्माण केली जात आहे.  दगड, पिस्तुलं असली हिंसा कशाला पाहिजे.  सर्व समाजातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ राजकारण्यांनी एकत्र या बसा आणि बोला.. कशाला कायदा हाती घ्यायचा त्यांच्याही काही मागण्या आहेत, त्यासाठी हिंसा कशाला? आम्ही कधीही जातिवाद केला नाही. राज्यकर्ता लहान मोठा सगळ्यांचा असतो. कुठल्या एका समाजाचा नसतो. कुणावर अन्याय होत असल्यास आवाज उठवावा, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये. ज्या राज्यात अशांतता असेल त्या राज्यात उद्योगधंदे येणार कसे?  असा सवाल देखील छगन भुजबळांनी केला आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Sandeep Kshirsagar: 'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 04 February 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपChhagan Bhjabal PC : औरंगजेबाला कोण लाच देऊ शकतो, सोलापुरकरांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रियाDhananjay Deshmukh Beed : बचावासाठी आरोपींकडून अनेक वरिष्ठांना फोन,धनंजय देशमुखांचा रोख कुणाकडे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Sandeep Kshirsagar: 'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Dhananjay Munde: अंजली दमानियांनी कथित घोटाळ्याची कागदपत्रं बाहेर काढली, धनंजय मुंडे तातडीने अजित पवारांच्या भेटीला पोहोचले
अंजली दमानियांची पत्रकार परिषद संपताच धनंजय मुंडे घाईघाईने अजितदादांच्या भेटीला, चर्चांना उधाण
Anjali Damania: डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी, अंजली दमानियांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांनी पुराव्यांसकट सगळंच बाहेर काढलं
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Embed widget