एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास : चंद्रकांत पाटील
![रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास : चंद्रकांत पाटील Chandrakant Patil Reaction On Raosaheb Danawanes Controversial Statement रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास : चंद्रकांत पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/14134753/chandrkant-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी : शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या वाक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज दिली. पिंपरीतील एका खासगी रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्राच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''मी मीडियाला काही बोलणार नाही. पण रावसाहेब दानवे यांच्या वाक्तव्याचा विपर्यास केला गेला. वास्तविक, दानवे शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सातत्यानं भांडतात.''
दानवेंच्या वक्तव्याने शेतकरी नाराज नसल्याचं सांगून, भाजपच्या संवादयात्रेचं नेतृत्वही तेच करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच विरोधकांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली तरी ते त्यांचे काम असल्याचा टोला यावेळी पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीला लगावला.
विशेष म्हणजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेवरुन राजू शेट्टींना चिमटा काढला. ''स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्मक्लेश यात्रा काढत असलीस, तरी त्यांना पक्ष वाढवण्याचे आणि बोलण्याचे स्वतंत्र आहे. हिच खरी लोकशाही आहे, त्यामुळं आम्ही त्यांना गप्प बसा म्हणणार नाही.''
तूर खरेदीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. जालन्यातील भाजप कार्यक्रमात बोलताना, ''राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX,'' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
दुसरीकडे विरोधी पक्षांसह शिवसेनेनंही दानवेंविरोधात आंदोलन सुरु केलं होतं. तर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दानवेंची जीभ छाटून आणणाऱ्यास पाच लाखाच्या बक्षीसाची घोषणा केली होती.
काल उस्मानाबादमध्ये मुख्यमंत्र्यांना दानवेच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रश्नाला बगल देत बोलण्यास नकार दिला.
संबंधित बातम्या
दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं मौन!
शेतकऱ्याला मानवाकडून अपेक्षा, दानवाकडून नाही : राज ठाकरे
…तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे
बेताल बरळणाऱ्या दानवेंवर विरोधकांची तोफ
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
‘दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं’, शरद पवारांचा खोचक टोला
शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा, भाजपच्या दानवाकडून नाही : राज ठाकरे
‘कर्जमाफी नको, दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा’
दानवेंच्या तोंडाला काळं फासा, 50 हजार रुपये मिळवा, मनसेची घोषणा
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion