एक्स्प्लोर
बैलगाडी शर्यतीसाठी अध्यादेश काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

चेन्नई: तामिळनाडूतल्या जलीकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरु करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली. दरम्यान आपणही या स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने तूर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज तामिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना मिळावी अशी भूमिका, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली. बैलगाडी शर्यतीवर बंदी शर्यतींदरम्यान बैलांवर अत्याचार होतात, त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै २०११मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे कोर्टात गेला. हायकोर्टानेही प्राणीप्रेमींच्या बाजूने निकाल देत शर्यतींवर बंदी घातली. मग दोन वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतीवरील हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली होती. दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावडेकरांकडे केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही बंदी कायम ठेवत सरकारला धक्का दिला. संबंधित बातम्या
बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज
बैलगाडी शर्यतीसाठी टॉवरवर चढून आंदोलन
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























