एक्स्प्लोर

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपचं ग्रामीण भागावर लक्ष

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री अनेक छोट्या गावात ते 2-5 मिनिटांचे छोटेखानी भाषण करताना दिसत आहेत. छोट्या-छोट्या गावाच्या मंचांवर मुख्यमंत्री जात आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे यात्रेच्या संपूर्ण मार्गावरील जे स्वागत समारंभ, जाहीरसभा आहेत त्यातील 90% ह्या ग्रामीण भागात आहेत.

  वर्धा : 'महाजनादेश' यात्रेच्या निमित्ताने भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने भाजपने महाराष्ट्रात आपली रणनिती बदलल्याचं दिसत आहे. शहरी पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आता ग्रामीण मतदार संघांवर लक्ष केंद्रित करत आहे. भाजपच्या या बदलेल्या 'फोकस'चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजानदेश' यात्रेतून दिसतो आहे.  या यात्रेची सुरुवात ग्रामीण भागातून म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या गुरुकुंज मोझरी येथुन झाली आहे. तसेच या यात्रेच्या मार्गात छोट्या मोठ्या गावात लोक दिसले कि देवेंद्र फडणवीस आपल्या विशेष बनवलेल्या रथाच्या हायड्रॉलिक लिफ्टचा वापर करून गाडीच्या छतावर येत लोकांचे स्वागत, अभिवादन घेत आहेत. अनेक छोट्या गावात ते 2-5 मिनिटांचे छोटेखानी भाषण करताना दिसत आहेत. छोट्या-छोट्या गावाच्या मंचांवर मुख्यमंत्री जात आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे यात्रेच्या संपूर्ण मार्गावरील जे स्वागत समारंभ, जाहीरसभा आहेत त्यातील 90% ह्या ग्रामीण भागात आहेत. यासाठी जिल्ह्याच्या गावच्या जागा देखील खुप कमी निवडण्यात आल्या आहेत. तिथे फक्त मुक्काम किंवा सकाळी  पत्रकार परिषद घेऊन पुढचा प्रवास सुरु होतो. '2104 नंतरची गेली 5 वर्ष शहरांवर भाजपाचा कंट्रोल पक्का करायचा होता. भाजपची ओळख हि तशी म्हणायला शहरी पक्ष म्हणून आहे. गेली 5 वर्ष तुम्ही आमचा फोकस शहरांवर पाहिला, आता येणाऱ्या 5 वर्षात हा फोकस गावांकडे राहील', असे या महाजनादेश यात्रेत सामील असलेल्या एका मंत्र्याने सांगितले आहे. 2-4 हजार किलोमीटर लांब यात्रेत देवेंद्र फडणवीस जवळ जवळ 150 विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील मतदात्यांपर्यंत पोहचणार आहेत. यात एकूण भाजपा सरकारने काय केले? हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  ग्रामीण जनजीवनात बदल घडवण्यावर सरकारने काय प्रयत्न केले यावर भरपूर फोकस आहे. सुरुवातीला विदर्भात ही यात्रा आहे. तिथे खास आधीच्या आघाडी सरकारवर निशाणा साधत सिंचन हा विषय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोठा केला आहे. त्याच बरोबर येत्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्लान असल्याचे सुद्धा ते इथे खास नमूद करत आहेत. या यात्रेत अजून काही महत्वाचे बदल लक्षात येण्यासारखे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे महाजनादेश यात्रा जशी भाजपाचे 'रिब्रान्डींग' करते आहे तशीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील रिब्रान्डींग करते आहे. संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस केंद्रित ही यात्रा मुख्यमंत्र्यांची इमेज राज्यव्यापी जननेता म्हणून घडवण्याच्या प्रयत्नात आहे. यात्रेच्या ऑफिशियल पोस्टरवर महाराष्ट्राचे दुसरे नेता म्हणजेच नितीन गडकरी यांचा साधा छोटा देखील फोटो नाही. त्यामुळे आताचे महाराष्ट्रावरील भाजपचे अधिपत्य हे फडणवीसांकडेच असल्याचे न बोलता नमूद होते आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget